गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

विषय उपवास

Kavi katta एक blog  कविंसाठी
विषय.  उपवास 
शीर्षक...गरजेचा


  येता श्रावण
  होतात सुरू उपवास 
  महत्वाचे हमखास 
  समजावे.

 उपवास उपयोगी
मनावर काबू ठेवण्यास
 त्यज्य करण्यास
 सवयींना .


कुठलीही सवय
होत असतात अती
कुंठीत  मती
होणारच.

उपवासाचे महत्त्व 
आहे तेची खरे
जाणावे बरे
सदाकाळ.
 
अन्नधान्याच्या उपवासाची 
श्रावणात असे गरज
पचन   सहज
 होण्यासाठी .


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...