शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

जीवनाच्या वाटेवर (लेख)

जीननाच्या वाटेवर
         खरच , जीवन हा एक प्रवास आहे . प्रत्येकाने ती वाट हसत , रमत गमत चालली पाहिजे. कारण या वाटेवर सदा काही फूलेच पसरलेली नसतात. कधी  काटे रूपी संकटे , दुःखे  तर कधी खळखळ मंजुळ आवाजात वहाणारे, दोन्हीही बाजूस सुंगधी
फूलांचे ताटवे , हसत खुणावणारी मृदु तृणांकरे रूपी  मखमली  सुखांची पाय वाट असते. तर जीवन ही सुख दुःखाची पाउल वाट आहे.
        तेव्हा जीवनात येणा-या या सुख दुःखाचा ज्याला तालमेळ जमतो. तोच यशस्वी  जीवन जगू शकतो.  म्हणूनच तर
        व्यथा असो आनंद असू दे
        प्रकाश असो वा तिमीर असू दे
          वाट दिसो  वा न दिसू दे
           रुणु झुणती तराने
           माझे जीवन गाणे
असे  आनंदाने येणा- या संकटांना मात करत , सामोरे जावे लागते .
      पृथ्वी  पहा ना ऊन वारा पाऊस सहन करत  परिभ्रमण करत असते.
अहो  , राम कृष्ण यांना पण कुठे जीवनात सरळ सोट अशी जीवन वाट लाभली. त्यांना पण जीवन वाटेवर फूले व कांटे आलेच ना. म्हणजे सुख दुःखे  आलीच ना .कृष्णा चा जन्म कारावासात झाला .जन्मल्या जन्मला पावसात , दुथडी भरलेल्या यमुनेतून  त्यांना
जावे लागले . तर रामास वनवास भोगावा लागला.
      एकूण काय जीवन ही खडतर वाट असते. नदी नाही का कांटेरी ,खडकाळ मार्ग  आक्रमित येत असते. तसेच आपली जीवन वाट. त्यात कधी कधी प्रलोभने येतात त्या प्रलोभनांना बळी न पडता धोपट मार्ग  आपनवत जावे लागते . नाहीतर जीवन वाट विकट बनते.
         जीवन वाटेवर  अंत पण नक्कीच  असतो. तो कोणालाच चुकत  सुटत नाही. तेव्हा जीवन वाटेवर चालतांना कर्म ह्यालाच देव मानत चालले पाहिजे. सत्कर्म ची कास धरून जीवन वाट चाललो की ती नक्कीच  सुखद होते.

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...