मंगळवार, ९ जुलै, २०२४

वृध्दापकाळ

साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित 
काव्य लेखन 

विषय..वृध्दापकाळ

ऊषा दुपार व निशा
विभागला सदा दिन
बाल्य तारुण्य वार्धक्य 
आयु अवस्थाही तीन 

सरे मजेत बालपण 
जवाबदारी  पेलता तारुण्य
पण कठीणता भासते
वार्धक्य असे कारूण्य

शरीर असते थकलेले 
मन मानायला नसे तयार
 सतत  उजळणी भुतकाळाची
मग वाद विवाद अपार 

 न करावे   सल्ला सूचन
आपण आपल्यात रहावे
चिंतन वाचन छंद कला
याला मात्र जोपासावे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...