रविवार, २८ मे, २०२३

उतार वय एक बालपणानं

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक
आयोजित उपक्रम 
विषय..उतार वय एक बालपण


 उतारवयात एकंदर
स्मरणशक्ती होते कमी
हालचाली मंदावतात 
आत्मविश्वासाची नसते हमी

 पण विसर पडत नाही   पण पुन्हा पुन्हा आठवतात
यौवनातील कर्तृत्वाचे दिन
हट्टीपणा बळावतो
पूर्वीचा मान सन्मान भासे क्षीण 


वाटे सदैव ऐकावे जनांनी 
 बोल  ओठीचे अनुभवाचे
 पांढरे केसांचे दावीती महत्त्व 
 नको तितके  उपदेश द्यावयाचे

   असते भरलेले आयुष्याचे 
    अनुभवाचे शहाणपण
   पण कधी वाटे कसे सांगू
    खरं पहाता. आता सुरु दुजे बालपण.

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...