शुक्रवार, २७ मार्च, २०२०

चहा


उपक्रम
विषय -चहा

सकाळी उठताच येते
आठवण ती चहाची
वाफाळलेला कप दिसता
सुस्ती उडले तनाची

काळ वेळ नाही लागत
केव्हाही आवडे पिण्यास
सुचत नाही वाटले तरी
हवा तो  विचार सुचण्यास

येते आठवण चहाची
 जमता ढग आकाशी
चहा आल्याचा आठवे
 वाटे मिळावा चुटकी सरशी

हाती असता चहा
गप्पा येतात रंगात
आठवणीं येतात जुळून
जुन्या काळच्या मनात

उगाच नाही  म्हणत
चहास पृथ्वीवरील  अमृत
येता जाता प्यावा चहा
प्राशन करावे जठरामृत

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...