सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

विरह (चाराक्षरी)

  विरह हा
 कशी साहु
 एकटी मी
कशी राहु

येते मज
तुझी सय
मनी वाटे
 उगा भय

विरहाचे
दुःख   कळे
रात्र  मला
सदा छळे

नको वाटे  
  मला जीणे
 तुझ्या विणा
सारे उणे

दुःख  मोठे
 विरहाचे  
ज्याचे त्याला
  कळायाचे


जळी स्थळी
तुझा भास
मनी सदा
एक ध्यास

नको आता
अंत पाहू
ये ना सख्या
 किती साहू


वैशाली वर्तक 7/12/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...