गुरुवार, २० एप्रिल, २०२३

दारिद्रयाची भळभळ

लोकशाही विचार धारा हा मंच
आयोजित उपक्रम
दि २०\४\२३
विषय ... दारिद्रयाची भळभळ


देवा ठेव सर्वांना सुखी
संपवावी दरिद्रता ही आस
पोटा पुरते मिळूदे सर्वा
हेच मागणे तुजला खास

सर्व जन राहो आनंदी
मिळो  कष्टाची भाकरी
स्वकष्टाने व्हावे मोल
हीच ईच्छा सदा अंतरी


पाहूनी द्रवते मम हृदय 
दारिद्रयाची भळभळ
सारी तुझीच लेकरे असता
का रे दिसे रस्त्यावर तळमळ

किती करिता कष्ट जीवनी
नाही येती कष्ट फळाला
सल दारिद्र्याची  राही मनी
वाटे कधी येईल अंत दारिद्रयाला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...