शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

मरगळ

विषय - मरगळ

 एक मनाची स्थिती 
 असते  ही  मरगळ
येता कंटाळा जीवाला
भासे नाही जीवात बळ
 
संगीत असे उत्तम 
कुठला तरी हवा छंद
येई अशा  वेळी कामा
 दूर  मरगळ, मिळे आनंद

 बदल पण हवा जीवनी
येतो उबग तेच काम करुन
वाढते जीवाची मरगळ
अर्थच  न वाटे मनातून

दूर करण्या मरगळ
जावे समुद्र  किनारी
  पहाता लाटा उचंबळलेल्या
 देती मनास उभारी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...