अ भा म सा प समूह2
उपक्रम 360
विषय - बलिदान
स्वातंत्र्याच्या लढ्यात
झाले शहीद जवान
बलिदानाचे जाणा मोल
भारत मातेचे ते वीर महान
केली नाही पर्वा घरदाराची
ओतियले वीरांनी पंचप्राण
पारतंत्र्य घालविण्यासाठी
केले सर्वस्वाचे बलिदान
इतिहास सांगतो त्यांची ख्याति
स्वातंत्र्य वीर आहेत अगणिक
समजावून सांगु त्यांची कीर्ती
कळेल महती ऐतिहासिक
नुसते वंदन करुनी दोनदिस
होत नसे उपकार फेड सहज
जाणा महत्त्व स्वातंत्र्याचे
आहे आज तीच गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
आठोळी काव्य
स्पर्धे साठी........
स्वातंत्र्य प्राप्ती हे सदा ध्येय
मनांत त्याच विचारांचे थैमान
हसत गेले फासावरी वीर
सुपुत्र झाले शहीद महान.
दहशत वाद्यांच्या विरोधात
रक्त सांडूनी करितात बलिदान
आनंदे स्वीकारती वीर मरण
भारतभूचे सैनिक जवान.
जय हिंद
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा