बुधवार, ६ मे, २०२०

कट कारवाया

स्पर्धेसाठी
विषय- कट कारवाया
 शिर्षक-

राजकारणात चाले
कट कारवाई खेळ
सत्ता मिळविण्यासाठी
सदा येतेच ती वेळ

शिवबांचा होता कावा
सदा गमिनीचा तेव्हा
सुटलेत आग्राहून
सही सलामत जेव्हा

महाभारतात आहे
भरलेले कारस्थान
खूप   केले कौरवांनी
पांडवाचे अपमान

आनंदीचा होता कट
नारायण मारण्यात
केला ध शब्दाचाच मा
 वंश अंत करण्यात

असे भरलेले कट
 जीवनात क्षणोक्षणी
किती जपून टाकावी
सदा पावले जीवनी

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...