सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

स्मृतिगंध चाराक्षरी

उपक्रम
स्मृती गंध

बसले मी
निवांतात
मन रमे
विचारात

आयुष्याचा
गत काळ
आता वाटे
तो सुकाळ

रम्य होते
बालपण
येता त्याची
आठवण

रोज मित्र
जमायचे
नित्य सारे
खेळायाचे

नको वाटे
शाळा तेव्हा
अभ्यासाची
भिती जेव्हा

विद्या  केली
संपादन
नोकरीचे
मोठेपण

केली मौज
कधी दुःख
मुले देती
आता सुख

अशी असे
आठवण
त्या काळाचे
ते स्मरण

वैशाली वर्तक 12/11/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...