बुधवार, १० जुलै, २०१९

चाराक्षरी विषय दुःख

दुःख

दोन बाजू
कधी सुख
तर दुजे
असे दुःख

नसे सदा
निशा नित्य
चाले चक्र
हेच सत्य

नका दावू
दुःख कदा
मोद मात्र
वाटा सदा

नसे कोणी
या जगती
दुःख नसे
त्या संगती

म्हणूनच
वदे संत
करु नका
कधी खंत

जाता दुःख
येई सुख
हा नियम
बोले मुख

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...