रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४
कष्टाचे चीज
रविवार, २९ सप्टेंबर, २०२४
अपराध
शाश्वत निरंतर
शाश्वत
जगी काहीच नाही निरंतर
नसे कसली शाश्वती
जीवन पण ,असे क्षणभंगुर
करिता विज्ञानाने कितीही प्रगती
किती ही करा प्रयत्न
टिकविण्याची जरी आस
प्रत्येक वस्तूला , व्यक्तीला
नाश हा असतोच खास
उत्पत्ती वाढ आणि अंत
या तीन्ही क्रिया होणार
पण हेच नित्य निरंतर
अमर्त्यची शाश्वती नसणार
जलचरसृष्टी पण नाही निरंतर
ते पण नाही शाश्वत
जो पर्यंत श्वास चाले
जीवन असे अविरत
अहो, म्हणती जरी सारे जन
अपत्य हवीत आपल्या संगती.
निवृत्त काळी आधाराकाठी.
मिळण्याची असते का शाश्वती.
मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४
आशा आणि अपेक्षा
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४
सहाक्षरी ...काय म्हणू सांगा
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४
101चारोळ्या राधेचा कान्हा
रविवार, २५ ऑगस्ट, २०२४
राधेचा कान्हा चारोळ्या 101
शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४
पंचाक्षरी मनोमिलन
गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४
पावसाळा
श्रावणधारा
गुजरातचा पाऊस फारच लहरी, मृग नक्षत्राची ७ जून तारीख सरून गेली तरी पावसाला त्याच्या येण्याची फिकीरच नसते. अहो ! 7 जून काय ? 7 जूलै झाली तरी कित्येकदा पत्ता च नसतो .तसा वळवाचा, गारांचा पाऊस पडून जातो म्हणा कधीतरी.
पण , साधारण पणे , श्रावण मासात सर्वत्रच सरीवर सरी पावसाच्या येऊ लागतात. आषाढातील पावसाने सृष्टी हिरवळी जाते . ग्रीष्माने, आलेले सुकेपण, रुक्ष पण ,निस्तेजता जाऊन पावसाच्या आगमनाने सृष्टी कशी तरारलेली असते. हिरवागार शालू नेसल्यागत दिसते.आणि कुसुमाग्रजांच्या कविते प्रमाणे ,"हसरा नाचरा जरासा लाज-या " श्रावणात तर, निसर्गाचा एकच रंग दिसतो तो म्हणजे हिरवा आणि म्हणूनच तर ऋतू हिरवा म्हणून संबोधला जातो. झाडे स्वच्छ धुतली गेल्याने मस्त हिरवीगार दिसतात. आपण आपल्या घरच्या रोपांना ,झाडांना कितीही पाणी घाला ,पण नैसर्गिक पावसाच्या पाण्याची त्याला सर येत नाही.
पण ,खर सांगू ? मला तर या श्रावण सरींचे वा पावसाळ्याचे जराही कौतुक नाही. तुम्ही म्हणाल काय अरसिक बाईआहे. अहो! पण आमच्या सोसायटीत की नाही पाणी भरते .बाहेरचे रस्त्यावर चे पाणी आत येते. जरा 2/4 इंच पाऊस पडला की झाsssले. जरा कुठे पावसाचा आनंद लूटत असता बाहेरचे पाणी आत येऊ लागले की पावसाची मजा जाऊन टेंssशन मात्र वाढते . कवितेतून ,पुस्तकातून, साहित्यातून, कवी मनातून श्रावणसरींची किssती कौतुक वाचलीत तरी प्रत्यक्षात पाऊस , पाऊसानंतर पाणी तुंबणे , घरात तर पाणी येणार नाही ना याची धास्ती.व घरात पावसाच्या पाण्याने येणारी ओल या सर्व गोष्टीेंमुळे पावसाचे येणे, म्हणजे दडपणच वाढविते.
नुसते काळ्या ढगांनी भरून आलेले आभाळ, ढगांचा कडकडाट , थंडगार वारे , ओल्या मातीचा सुगंध हे सारेssसारे काही सुखद वाटते. अशावेळी की नाही, घराबाहेर मागच्या अंगणात वा पुढे झोपाळ्यावर , ओट्याच्या कट्टयावर वा बाल्कनीत बसून, हातात मस्त वाफाळलेला कॉफीचा कप तसेच जोडीला टॕब वा मोबाईल घेऊन whatsapp चे msgs वाचीत बसावे व त्या वातावरणाचा उपभोग वा मजा लुटत बसावे अशी तीव्र ईच्छा होते.पण जर, मेघराज गर्जना करत बरसायला लागले व पाऊस वाढला व बाहेरचे पाणी सोसायाटीत घुसू लागले तर या श्रावण सरी ज्यांचे आपण आता गुणगान करतोय ना ,त्यांचा जोर वाढला तर , "देवा बस कर रे बाबा हा पाऊस, आवर घाल या श्रावण सरींना. नको हा पाऊस ." असे विचार मनात येतात आणि त्या वाढत्या पावसाने पाणी घरात येईल तर ? या विचाराने जीवाची घालमेल सुरू होते.
तसे तर जून महिन्यातच घराच्या entance ला भिंत घातली जातेच.लहान रांगतीमुले घराबाहेर जाऊ नयेत म्हणून भिंत घालतात ना?तशी .बाहेरचे पाणी आत येऊ नये म्हणून सोय करण्यात येतेच .
बर हा पाऊस दिवसा असेल तर ठीक. आणि जरी ही दिवासा पाऊस असला व वाढला की लगेच मुलाचा , सुनेचा आॕफीस मधून फोन खण-खणणू लागतात, "आई, येथे पाऊस फार आहे .आपल्याकडे कसाकाय? पाणीतर भरू लागले नाही ना? " एवढेच काय माझ्या इंजीनीअर मुलाने तर बाथरूमला खास दट्टे बनवून घेतले आहेत . त्या मुळे बाहेरचे पाणी वाढले तरी गटर बॕक मारीत नाहीत.तर सांगयचे की त्यांचे ,मुलांचे विचारणे सुरू होते दट्टे घट्ट लावलेत का? तपासून पहा म्हणून. आणि पाऊस रात्री असेल तर मग काय ? मंगळागौर नसतांना पण जागरण करणे आलेच. बाहेर व-हांड्यात वारंवार जाऊन, पाणी येऊ लागले का ? पाण्याची लेव्हल वाढत तर नाही ना? सतत पहाणे. चालूच रहाते. धड झोप पण निवांत मिळत नाही.
अरे हो !पाणी भरणे यावरून आठविले . परवा भिशीत ,पुढची भिशी कोणाची तर ही आपली अपर्णा लगेच म्हणाली, "ए मी आॕगस्ट च्या पुढे भिशी घेईन ह .कारण माझ्या flat खाली भरपूर गुडघा भर पाणी जमते , मग कशा येणार तुम्ही ? या वैशालीचे ठीक आहे येईल दोन चार हात मारत ," त्यावर वैशाली तिला म्हणाली ,"तुझे ठीक आहे ग ,तू वर रहाते.आमचा तळमजला. त्यामुळे एकदा दोनदा तरी पावसाळ्यात, काश्मिरला न जाताच शिकारात रहाण्याचा अनुभव घेतो.आणि सरी थांबल्या व पाणीओसरले की मग काय ? तळमजला त्यामुळे सर्व जण कामास लागतो.त्या पावासाच्या पाण्याने अंगण , घरासमोर , मागचे आंगण वगैरे सफाई काम करावे लागते ते वेगळेच. पण काय करणार ?
श्रावण सरी तर बरसल्याच पाहिजेतच ना!
पण, मला काय वाटते ? इंद्राच्या दरबारात एक application च करावी. लिहावे अन् सांगावे की अरे बाबा रोजचा एकच इंच पाऊस पाड म्हणजे पाणी पण जमिनीत मुरेल,व ज्यामुळे बोअरच्या पाण्याचा प्रश्न रहाणार नाही.व महत्त्वाचे श्रावणसरींचा आनंद लुटता येईल आणि असाही गुजरातमधे सरासरी 30 ते 35 इंच पडतो.
म्हणजे काय? ते मी सांगते माझी आईडिया. लहान पणी आपण पत्त्यांचा पांच/ तीन/ दोन डाव खेळ खेळायचो ना?आठवतो ना? सर्वांना ?
त्यात जेवढे आपल्यास डाव करावयाचे असायचे तेवढे झाले की म्हणायचो ना? माझे झाले बाबा पोटापाण्या पुरते डाव. .
तसे इंद्र सरकारला सांगावे रोज एकच इंच पाऊस पाड.मग श्रावण सरींचा आनंद लुटता येईल मजा घेता येईल . पण इंद्र दरबार वा सरकार काय आपली स्टेटबेंकआहे? ठराविक रक्कम प्रमाणे रोजचा एक इंच पाऊस withdrawalकरता यायला . रोज 1" पाऊस पाडायला.?
तर असे हे रडगाणे आहे. मग सांगा कसा आवडेल पावसाळा.
सजणा सांजवेळी असा....... प्रदीप ला दिलेले पहिले गीत 25/4/20
रविवार, १८ ऑगस्ट, २०२४
नाते हळवे
स्वप्नातील नव वर्ष
स्वप्नातील नववर्ष
नववर्ष स्वन्प माझे
रंगविले होते मनांत
कितपत होते पाहू
साकार ते प्रत्यक्षात
स्वच्छ असेल सुंदर
देश भारत महान
समानता ही नांदेल
नसता कोणी लहान
कळ्यां कधी न खुडता
हाती तयांच्या लेखणी
होई मुलगी साक्षर
सावित्री रूपे देखणी
वृक्षारोपणाचा नारा
गाजवूया या जगती
पृथ्वी पाहू नटलेली
भासे जणू रूपवती
किण किणली ती घंटा
जागे झाले स्वन्पातूनी
नाद आला मंद कानी
रम्य ते स्वन्प पाहूनी.
वैशाली वर्तक
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४
मी भाग्यवान आहे
बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४
हितचिंतक
भा सा व सां मंच गडचिरोली
आयोजित
उपक्रमासाठी
विषय - हितचिंतक
देव असे हितचिंतक पहिला
होता उषःकाल वंदतो तयाला
दावितो नवी उषा नव आशांची
प्रफुल्लित करितो जन मनाला.
हितचिंतक देती शुभ कामना
होता उत्तेजित पडते पाऊल
यश मिळवण्या मिळते चैतन्य
मनाला लागते यशाची चाहुल.
मंगल दिन वा वर्धापन दिनी
करिती वर्षाव हितचिंतनाचा
वाचता ऐकता शुभ संदेशांना
पारावार न उरतो आनंदाचा
हितचिंतक रहावेच सदाची
न लागतो पैका गोड बोलण्यात
सदा शुभेच्छा द्याव्या मना पासूनी
कशाला ती दरिद्रता वचनात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४
मोकळा श्वास पिंजऱ्यातील पक्षी
शनिवार, १० ऑगस्ट, २०२४
एक धागा मैत्रीचा
अभामसाप धुळे जिल्हा
आयोजित काव्यलेखन उपक्रम
विषय ..एक धागा मैत्रीचा
धागा धागा विणतो
विणकर नित्य नेमाने
दिन एक एक सरतो
आयुष्याचा क्रमाने
किती येती परिचयात
व्यक्ती अगणित जीवनी
पण स्नेहाचे मैत्री नाते
सहजची जुळते मनोमनी
राज्यपद विसरुनिया
बालपणीची मैत्री स्मरली
कृष्णाची सुदामाशी जीवनी
जग जाहिर मैत्री ठरली
नसे माझे तुझे भाव
मदतीला सदा तयार
मैत्रीच्या गोड नात्यात
स्नेहाचा भाव अपार
योग्य वेळी योग्य सूचन
अखंड आपुलकी केवळ
दोन तने एक मन
अशी असते मैत्री निखळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४
विषय उपवास
पाच वर्षे अभिमानाची
बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४
वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई
सवय जाहली मनाला रोजची
चला घेऊ हाती ,चहाच्या घोटा संगती
वर्ल्ड व्हिजन मुंबई टाइम्स
वाचक वाचनात रंगती
होता सकाळ चैन न पडे जीवाला .कधी नजर फिरवतो. असे प्रत्येकास होते
साहित्यातील गद्य पद्य विभागातील चाराक्षरी ते बाराक्षरी , तसेच अभंग,गीते, विविध प्रकारची काव्ये, तर गद्यात लेख, ललित लेख,व सावित्रीताईंचे संपूर्ण जीवनाची माहिती देणारे,महत्त्व पूर्ण असे कला ,क्रीडा,साहित्य, सांस्कृतिक, क्षेत्रातील महान व्यक्तींचे यथार्थ वर्णन करणारे अग्रलेख. म्हणजे ज्ञानवर्धक खाद्य .असे वर्ल्ड व्हिजन टाईम्स देतो.आणि रोजच्या रोज ज्ञान. हे ज्ञान घेता घेता वर्धापनदिन आला.
नवोदित कवी कवयित्रींना लेखनास स्फूर्ती देणारा असा वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई.
संपादक प्रा नागेश सोपान राजेश हुलवणे, सह संपदाक राजेश साबळे,व अग्रलेख लेखिका सावित्रीताई झांबरे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.असे मराठी राजभाषेचे लोकप्रिय साहित्यिक वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई यास खूप खूप शुभेच्छा.ब्रीद वाक्या प्रमाणे अनियीत काल प्रकाशित होत मराठी भाषेची सेवा घडो ह्याच शुभेच्छा.
शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४
मुलांच्या सांगोपनात जडण घडण व संस्काराचे महत्त्व
बुधवार, ३१ जुलै, २०२४
मन झाले ओले चिंब
व्यसनाला आळाघाला
मंगळवार, ३० जुलै, २०२४
मनाचा हळवा कोपरा आंगण
रविवार, २८ जुलै, २०२४
कटु सत्य अनुभव
शनिवार, २७ जुलै, २०२४
परंपरा
परंपरा
जुन्या चालीरीती रिवाज
पुढे चालवणे ही परंपरा
जतन करणे संस्कृती ला
हीच शिकवण मनी धरा. १
रुढी चालीरीती परंपरांचे
करतोय आपण जतन
भारतीय संस्कृती आपुली
आहे अति पुरातन. २
साजरे करितो सणवार उत्सव
दिसते तयातून रूढी परंपरा
उत्सवातून दिसे समाजप्रेम
समतेची ध्वजा हाती धरा. ३
किती वर्णावी परंपरेची गाथा
येथेच जन्मले संत, वीर महान
अन् अंतराळात जाणारे शास्त्रज्ञ
काय सांगावी परंपरेशची शान. ४
अशी महान परंपरा भारतीय
असावा मनी सदा अभिमान
साहित्य , कला, क्रिडा ,संगीतात
एक एक चमकते तारे महान. ५
जुन्या रिती रिवाजात
सामाजिक करुन बदल
नव्या रितींचे अनुसरण केले
हे घडले ते ही नवल. ६
सण वार पारंपारिक
होतात देशभर साजरे
होता संस्कार संस्कृतीचे जतन
दिसती सर्वत्र चेहरे हासरे. ७
लाभलाय आपल्याला
भक्ती रस साहित्याचा
संत वाणीचा वारसा
तोची अमुल्य ठेवा परंपरेचा. ८
गुरुवार, २५ जुलै, २०२४
कर्तव्याच्या पथावर
बुधवार, २४ जुलै, २०२४
काव्य अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे
मंगळवार, २३ जुलै, २०२४
काव्यांजली. ओल्या तनूवर
शब्दरजनी साहित्य मंच
काव्यांजली काव्यप्रकार
विषय ...ओल्या तनूवर
शीर्षक. आनंद जाहला
पाहता पाहता
बरसल्या मृग धारा
वाहे थंडवारा
चोहीकडे
आसुसलेली धरा
ओले थेंब प्राशिता
आसमंती दरवळिता
मृद्गंधाने
सख्या वरुणाने
ओल्या थेंबाने तनूवर
पसरविला बहर
हिरवाईचा
जाहली किमया
पलटली सारी काया
जलधाराची माया
वसुधेवर
बळीराजा हर्षभरे
उंचावून पाही नभाकडे
क्षणात शिवाराकडे
आनंदाने
वैशाली वर्तक
अहमदाबाद
प्रवाह
भस्मासूर प्रदुषण रोगराई आमंत्रण
मोर्चा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र
23/7/24
विषय ...*भस्मासूर प्रदुषण*
*रोगराई आमंत्रण*
शीर्षक..जतन पर्यावरणचे
जळी स्थळी सर्वत्रची
*भस्मासुर प्रदुषण*
ठेवा स्वच्छता अन्यथा
*रोगराई आमंत्रण*
करा सदा कटाक्षाने
निवारण कच-याचे
स्वच्छ देश अभियाना
करा पालन नियमाचे
वृक्ष देती प्राणवायु
वृक्षतोड थांबवुया
लावा झाडे सभोवती
वनश्रीला वाढवुया
स्वच्छ राखुनी शहरे
करुनीया हरित धरा
पटकावू की उच्चांक!
समृध्दीचा वाहो झरा
फटाक्यांच्या आवाजाने
हवेचे, ध्वनीचे प्रदुषण
नको -हास पर्यावरणचा
कमी करुयात दुषण
निसर्गाचा नसे कोप
मानवाचा अती लोभ
प्रगतीच्या नावाखाली
थांबवुया आता क्षोभ.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सोमवार, २२ जुलै, २०२४
चित्र चारोळी
कष्टाचे चीज
कष्टाचे चीज खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
विषय - भारतीय संस्कृती *संस्कृती महान* भारतीय संस्कृती आपुली आहे अति पुरातन रुढी अन् परंपरेची सदैव करतोय आपण जतन सारे मानव आहेत...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...