सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

आनंद कंद वृत्तात दु:ख

मोहरली लेखणी साहित्य समूह 
आनंद कंद वृत्तात 
विषय दु:ख

सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे.
नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे

संतोषिला मनाने,वाटे न खेद त्याला
दु:खात मोद शोधी, भासे सुखी जगाला.

मिळताच मोद जीवा, येताच सुख घराला
राही सदा खुषीने ,   आनंदिला क्षणाला.

दाटून कंठ येतो, वाटे नकोच जगणे
डोळ्यात अश्रु धारा,नित्याच झाल मरणे.


ठेवून  शांत जीवा, जाईल दु:ख सारे 
शमतील दु:ख आता, वाहेल सुखद वारे 

वाचून संत वाणी, माझे मला कळाले 
नाही जगी सुखी तो ,भय दु:ख ते पळाले.


गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

किंमत. ( कशा कशाची)


मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

विषय

किंमत.  (  कशा कशाची)


वेळ ,व्यक्ती ,वस्तू ,पैसा ,श्रम

सर्व सर्वची असे बहु मोल

कशा कशाची  किंमत मोजणार

जगी काही नाही अनमोल 


होता सकाळ घाई कामाची

नास्ते ,डबे , स्वयंपाक कामाची

जाणावी   किंमत वेळेची

शाळा ,कचेरी ,उद्योगास जाण्याची 


महिना संपताच घराचे रेशन,

घरभाडे घरखर्च दावे किंमत पैशाची 

स्वतः साठी कुटुंबासाठी वेळ देता

धावपळीत समजेल किंमत वेळेची



देवे दिधला जन्म मानव

जाणा किंमत जीवनाची

सत्कर्म करून आनंदे राहू

ठेव जपू संचित कर्माची


पाणी हे निसर्ग दत्त

तरी जाणा त्याचे मोल

जल   जिरवा  मातीत

राखू     निसर्गाचा   तोल



 माय बाप गुरू यांची

सदैव हवी जाण जीवनी

 ठेवून किंमत त्यांच्या कष्टाची 

ऋण मानावे मनोमनी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

पंचाक्षरी...तलाव

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित उपक्रम 
पंचाक्षरी लेखन 
विषय. तलाव

गावाच्या वेशी 
आहे तलाव. 
नाही तयाचे 
ठाऊक नाव


नित्य येतात
फिरण्या जन . 
होते सा-यांचे
आनंदी मन.

उठे तरंग 
 मना आनंद 
पाहता लागे 
जीवाला छंद .

हंसाची जोडी 
तरंगे छान. 
 कमळ फूले
 वाढवी शान.

वाहता वारा 
झाडे डुलती 
 सावल्या त्यांच्या
जळी हासती.

तळ्याच्या काठी. 
वड तो उभा. 
भासे जणु की 
घेतोय  सभा. 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

मोहपाश

लालित्य नक्षत्रवेल
आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी

विषय -  पाप मोहाचे सुटेना


मन असते चंचल
काम आहेची कठीण
क्षणा क्षणाला धावते
मनी विचार  नवीन

सहा पहा षडरिपू
 संस्काराची मनी  ठेव
 सदा  ग्रासताती मना
  भूल पाडी एकमेव

मन कसे आवरावे
मना कधी उमजेना
मन चंचल पाखरु
  मोह पाशाचे सुटेना

माझे माझे सुटेचना  
भव ताप होतो फार  
जीव अडके मोहात
होती  यातना अपार  

पाश मोहाचे सोडण्या
हवी अध्यात्माची जोड
संत वाणी ऐकू  सदा
जीवनाचा अंत गोड

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

काव्य बत्तीशी ..सरत्या वर्षात शिकलेल्या गोष्टी

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम क्रमांक 1359
सरत्या वर्षात शिकलेल्या काही गोष्टी 
काव्य बत्तीशी 
7/9/7/9

 वर्ष सरत आले
सुरु झाला आखरी मास 
या वर्षी शिकले मी
नव्या गोष्टी ही हमखास 

जाणत नव्हते मी
वृत्त बध्द काव्य लेखन 
जाण झाली  समूही
मिळाले विचारांचे धन.

देऊन शब्द रोज
करविला आम्हा सराव
दावूनी चुका नित्य
घेतला लेखनाचा ठाव.

कार्यशाळेत पहा
देताची  नवीन विषय 
सरसाविती सारस्वत
ध्यानी घेता आशय

घेतले संभाळूनी
अनंत  आहे उपकार 
 न दाखविता   राग 
नाही आम्ही विसरणार .

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

कुटुंब

काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक 734

13/12 /25
विषय .. कुटुंब 
शीर्षक - माझा आधार कुटुंब


कुटुंब नसे चार व्यक्तींचा
सहज एकत्र रहाता मेळावा
तर असे प्रेमाचा, जिव्हाळ्याचा
एकमेका जीव देणारा गोतावळा.

आई करीतसे  संस्कार सिंचन
बाबा असती  कुटुंंब आधार   
प्रेमळ नाते भाऊ बहीणीचे
ताई उचले आईसंगे घराचा भार.

भिंती  घराच्या असती खंबीर
 जिव्हाळ्याचा घेती ठाव
 सदा एकमेकांना  देती साथ
 नित्य  एकमेकांशी  प्रेम भाव

नाती गोती जपत कुटुंब
सदा मनी कुटुंबा अभिमान 
सुख आनंद मिळवे जीवनात
 कुटुंब जनांचा वाढे जगी  मान.

रहातो सदा गुण्या गोविंदाने
नसतो विचार स्वार्थाचा
देणे आनंद, सुख, कुटुंबजनांना
हाच विचार असे  सदा मनाचा

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

घर ... कविता/कथा / पत्र ल ेखन / लेख / ..अभंग बाल कविता

लोक मान्य. लोकनेता टिळक

विषय *लोकमान्य*

 भारतीय  पेहराव 
 लोक मान्य टिळकांचा
 विडा स्वातंत्र्य प्राप्तीचा 
उचलला नेतृत्वाचा.

*लोक* हीच शक्ती आहे
मिळविण्या स्वातंत्र्य.  
प्रबोधन दिले  जना
 घालविण्या पारतंत्र्य 

हक्क मागण्या स्वातंत्र्याचा
 सिंह गर्जना केली  बेधडक
स्वातंत्र्याचा लढ्यासाठी
 प्रेरणा  व धैर्य दिले बेशक

जन जागृती करण्या
गणेश उत्सव केला सुरू
 एकतेचे बळ आणण्या
झाले ते, स्वातंत्र वीरांचे गुरू

तरुण भारत,केसरी 'तून
केली  जागृती जनात
केल्या शिक्षण संस्था स्थापन
गीतारहस्य रचिला कारावासात.

निर्भयतेने मांडित मते
स्वातंत्र्याचा  होता ध्यास 
कधी न झुकले कोणा पुढे
लोकमान्य लोक नेता खास



वैशाली वर्तक 

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

वृत्त आनंद कंद. विषय कविता

वर्ल्ड व्हिजन टाईम्स मध्ये 


वृत्त बध्द काव्यलेखन 
वृत्त  आनंद कंद 
लगावली गागाल गालगागा गागाल गालगागा
   विषय ...कविता 
  शीर्षक. प्रेम कवितेशी

दैनंदिनी पहाता,आले विचार ओठी.  
ओवीत शब्द माळा, कविता तयार मोठी.   

झरतात शब्द जेव्हा,वाहे अखंड सरिता.
माझ्या कवी मनाची, भावे जनास कविता.

बेधुंद होत मन हे, येताच  शब्द हाती
सुचता विचार धारा,  ओंजळ  भरुन जाती.

पाहून डोलणारी ,वा-या सवे  फुले ती,
रेखाटता सहजची , आनंदली मुले ती.

देते कधी सुवचने, सारून ती निराशा.
संबोधते./ जनांना , उजळेल आज आशा

दावीतसे अबोला ,का तू कधी रुसूनी 
यमके न साथ देती ,बसतेस तू फुगूनी,

माझे मला कळाले, करिताच नित्य   वाचन   
स्फूरेल काव्य मजला, नियमित करीन  लेखन


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

चित्र काव्य


 सिद्ध साहित्यिक समूह 

आयोजित उपक्रम 673

दि 3/12 ते 4/12

चित्र काव्य 

        आईची माया 


संपताच पानगळ सुरू 

ग्रीष्म ऋतूची दाहकता

लाही लाही  होते अंगाची

नको वाटे, ती रवीची प्रखरता

  

माता पदर, तिच्या साडीचा

धरी लेकरांच्या शिरी

वात्सल्याची देतसे छाया

आईचे प्रेम दिसे ऊरी 


केविलवाणा चेहरा उन्हाने

आई हृदया पाहवेना

सहजतेने उमजले तिजला

अशी सावली देऊ लेकींना


आईच्या प्रेमळ हिरव्या पदरी

लेकी चालती छायेत

उगाच का म्हणती जगी या

उणीव न भासे आईच्या मायेत


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

भावना

मन असते चंचल
  करी क्षणोक्षणी विचार 
   कल्पनेत होता रममाण 
 भावनांचे दर्शन अपार 


 मनातील भाव दाखवी
भावना  मुखावर क्षणात
विरहाचे भाव दिसती
नारीच्या वागण्यात 

भावना असे संवेदना 
 प्रसंग येतो जसा
अंतर्मनीच्या भावना
भावदर्शन घडे तसा


घडता भिषण प्रसंग 
विमान अपघाताचा
 दु:खी भावना मनाने
धावा सुरु मनी देवाचा

वैशाली वर्तक 

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

आनंद कंद वृत्त दुनिया


मोहरली लेखणी साहित्य समूह 
आनंद कंद वृत्तात 

दुनिया 
आहेच हे खरे की, दुनियेत रीत न्यारी 
जावे कुठे तरी ती, सोपी नसेच सारी          

दुनियेत लोक नाना,  सारे कसे   शहाणे 
वेडेपणाच दावी , होऊन ते  दिवाणे 

कोणास वेड भारी,कोणात ती धडाडी 
काही उगाच भित्रे, काही करी लबाडी

होते असे कधी ते, सोडून चोरट्याला 
 शिक्षेस योग्य मानी ,  निष्कारणी जनाला

चाले असा निरंतर, दुनियेत खेळ सारा
वाटे मनी कधी हा , होईल नीट न्यारा.    


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 


सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

वृत्त बध्द. वृत्त आनंद गुरू दक्षिणा काव्य

वृत्त बध्द कविता 
वृत्त आनंद 
लगावली ... गागाल  गालगागा 
गुरू दक्षिणा काव्य 

आभार मानण्याते 
काहीच आकळेना
शब्दात मांडु कैसे 
माझे मला कळेना.

वृत्तात जाण आली
ज्ञानात वाढ झाली 
साहित्य लेखनाची 
आवड मना मिळाली. 

होती मनी अपेक्षा 
वृत्तात पद्य  यावे
देवून ज्ञान तुम्ही.  
सारे तयार व्हावे 

आहोत आपणाचे
सारे  सदैव ऋणी
कविताच पाठवूनी
आनंदले मनानी 

वाचून हर्ष व्हावा
आहे मनी शुभेच्छा 
देते गुरू दक्षिणा 
आहेच ही मनीच्छा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

वृत्त भुजंग प्रयात. सख्या रे. कविता



 वृत भुजंगप्रयात 
लगावली.   लगागा लगागा लगागा लागा

        सख्या रे

कितीदा तुला सांगते मी फिरुनी
 सख्या ये तरी तू नदीच्या किनारी        

नको ते फुकाचे बहाणे  सदाची. 
मनी खेद दाटे उरी तो फिरूनी 

मनीची गुपीते कथाया तुला मी
कधी सांग येऊ नदीच्या किनारी

 कितीदा  विनंती करावी  तुला रे
  तुलाही कळावी  मनाची व्यथा रे

नको ते, तुझे रे , कधी चांदणे ही,
तुझी साथ राहो  नशीबी सदाही. 

वैशाली वर्तक

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

वृत्त बध्द कविता आनंद कंद. आई

 वृत्त आनंद कंद

लगावली गागालगा  लगागा

आई


आईच शब्द कानी, ऐकून मोद दाटे

पाहून तव मुखाला, भेटीस  वाट पाही


मिळवून सर्व काही, हर्षीत मी मनाने

स्वर्गीय तोष लाभे ,आईस भेटण्याने

चिंतेत  जीव तीचा , हाची‌  विचारी राही.      

 पाहून तव मुखाला भेटीस वाट पाही


नजरेत तीच येता , मन हर्षते खुशीने 

सुखस्वर्गची पहाते ,माझेच मी मजेने 

शब्दात सांगण्याते, अपुरेच शब्द राही

पाहून तव मुखाला , भेटीस वाट पाही

सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

अबोल मी अबोल तू

 अभा म ठाणे जिल्हा समूह१

आयोजित 

विषय - अबोल मी अबोल तू


अबोल तू अबोल मी

भावना मी मनीच्या जाणेल

प्रीतीला नसतेच गरज

शब्दा विना सारे उमजेल


पक्षांना असते कुठली भाषा 

तरी कळतात  भावना

मन जुळता अबोल पणे

पूर्ण  होतात  मनीच्या कामना


 बासरीचे सूर ऐकता 

 राधा होई बावरी

अबोल पणात खूप  सारे

सहज उमजे कधीतरी


  नयन असती बोलके

 नजर ईशारे  असती ठाव

 भाव मनीचे डोळ्यात 

  अचूक पणे सांगती भाव 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

वृत्त बद्ध मनोरमा वृत. चाहुल गणेशाची. निरोप गणपती ला

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

आयोजित सराव लेखन 

वृत्त मनोरमा

लगावली.  गालगागा गालगागा 

चाहूल गणपती ची

###############


गणपती येणार वदता

खास यंदा गणपतीची 

कोणती आरास घ्यावी

 वेळ होते ठरविण्याचे


मोद वाटे सर्व लोकां

वाट पाही  आतुरीने.   

सामग्री ही आणलेली.   ,

नीट पाही जाणिवेने


होत आली वेळ आता

धीर माझा   राहवेना

वाट पाही लोचनेती

वेळ आता काढवेना


टाळ झांजा खास आहे

आरतीला वाजवूया

भक्ति भावे गात भजने

रात्र सारी जागवूया 


तूच येतो सर्व काळी 

संकटाशी झुंज द्याया

बोलताती दु:खहर्ता 

तूच माझा देव राया


भक्त येती दर्शनाला

सोहळा तो मोद कारी               

हर्ष भासे तूच येता

 भास तव हा हर्षधारी.                       


मोरयाचा नाद येतो

ऐकण्यासी तोच कानी

श्रीगणेशा पूजताना

गात राहू गोड गाणी

वैशाली वर्तक



मोहरली लेखणी साहित्य समूह 

विषय.      निरोप 

वृत्त मनोरमा

लगावली.  . गालगागा गालगागा 

 

रोज रात्री आरतीला

मोद वाटे सोहळ्याचा

टाळ झांजा घेत हाती 

घोष चाले गणपतीचा


आजच्या त्या आरतीला

आल पाणी  लोचनांना 

कंठ भारी दाटलेला

नाम त्याचे गर्जताना


ठेवताना ती शिदोरी

मोरयाचा नाद चाले              

आपुल्या सदनी निघाले

आज  ओठी. शब्द आले. 


मखर वाटे ते फिके हो

सदनही वाटे भकास

धूप दीपक मंद झाले

जन मनाने ती उदास 


नाव घेता गणपतीचे

दु:ख. क्षणी  दाटलेले

जड मनाने परतले जन

नयन ते पाणावलेले


  वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

वृत्त लवंगलता. ८+८+८+४ मानवता हाच धर्म

तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत 
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित 
तितिक्षा काव्य लेखन स्पर्धा 

वृत्त.. लवंगलता.( ८+८+८+४)
कवितेच्या ओळी पूर्ण करणे,


     शीर्षक ...  मानवता हाची धर्म 

मानवतेचा पथ सजवाया , होवुनिया रांगोळी 
माझ्या नंतर शिल्लक मागे , या कवितेच्या ओळी.

मानवता हा ,धर्मच माना  , जात एकची, मानव.
नसे उच नीच , हेच जीवनी, खरे मर्म रे ,बांधव.

देवासाठी ,देता उजेड, सारेची जन ,समान.
दुजा  भावची, न कदा दावी ,आहे तोची महान.

 संस्काराचे करूनी जतन , क्षुधितास अन्न देणे
उजवा दुखता, वाम कराने, जसे की पुढे, येणे


 सुरसरि दिधली , मुक प्राण्याला,  ही संतांची, शिकवण 
भूतदयेची , जाण जपूनी,  कर संतांचे    चिंतन 

संस्कृतीची महान शिकवण  मनात ठेवू , ध्यानी
पुढे चालवू, मानवता पथ ,संगे गाऊ ,गाणी

विश्वे शांती,  लावून दिपक,   समजावू ऐक्याला
ज्ञानेशाचा पसायदान   मंत्रदेऊ    जगताला

संस्कृतीच्या, परंपरे ची  , काढूया  रांगोळी,
 सा-या विश्वी , ऐकू येती , या कवितेच्या ओळी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

वृत्त बध्द. माझा गाव लवंग लता वृत्त

वृत्त. लवंगलता
मात्रा ८-८-८-४
विषय ..माझा गाव

रम्य निसर्गी आवडे मला रहावया मज गावी
निसर्गच पहा क्षणाक्षणाला रूप तयाचे दावी 

नदीच्या तटी छोटी छोटी टुमदार घरे वसली
साधे भोळे जन आनंदी चिंता नाही कसली

रोज सकाळी पारावरती विचार विनिमय चाले
कधी न चुकता भेटीगाठी अंगवळीचे झाले 

संध्याकाळी भक्ती भावे जन मंदीरी जमती
आनंदाने भक्ती भजनी मजेत सारे रमती 

गेले होते   सहज पहाण्या,  आहे का ते तसेच 
 जाता गावी, पाहूनिया मी, चकित जाहले  लगेच,


सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

अभंग हरीची विविध रूपे

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

स्पर्धेसाठी अभंग 


अभंग लेखन स्पर्धा क्रमांक ४५

२\११\२५

विषय.  हरीची विविध रूपे 

    हरी पहा



करावे सत्कर्म.| वसे तो कर्मात |

नाही देव्हाऱ्यात | हरी सदा ||


गंध पसरला. | कळी उमलली |

हसत लाजली | हरी कृपे.     ||



हरीची किमया | सदा दिनरात |

शोधा निसर्गात | हरी रूप.   ||


भुकेल्यास देता |. आपुले कवळ. |

असे तो जवळ | तृप्त भावे.   ||


ओळखला नाही | जेवला. सुखात. |

तृप्त माणसात  |.हरी पहा ||. 


मानव देहाने. | कर्म करी सारी. |

करावी ती न्यारी | हरी भेटे. ||


न दिसे सहज |. दुधातले लोणी | 

देही चक्रपाणी. |. सदा साठी. ||


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

अनलज्वाला विषय पाऊस

अनलज्वाला 8-8-8-=24मात्रा
         विषय  पाऊस 

मेघ दाटले सोसाट्याचा सुटला वारा 
नकोच नुसता तो गडगडाट गगनामधुनी  
या मेघांनो गर्जत बरसत  वाट पाहतो 
शेतकरीगण लावून नयन शेतातूनी

वर्षा धारा सरसर झरल्या तप्त धरेवर
खुशीत येती शेतकरीगण  मग मनोमनी
आनंदाने फुलून येई  मन कृषिकाचे 
दिवस सुगीचे दिसतील अता मला जीवनी

तृप्त जाहली तृषित धरित्री  जलधारांनी
जल  शोषूनी  वसुंधरेचा रंगच  हिरवा       
  सजले डोंगर कडे कपारी राने सारी
सुंदर ऋतु तो  दिसता मोहक वदती बरवा



जलधारेने  केली किमया अवनीवरती 
.चोहीबाजू  अवघा एकची   रंग पसरला 
  भिजली पाने भिजली राने झाली ओली
वरती खाली सर्व दिशांना मोद विहरला.  

काळे काळे जलद धावती  गगनातूनी
 पहा अंबरी मेघ दाटले गर्जना करी
मधेच दावी करिता चमचम  नृत्य दामिनी 
रिमझिम धारा सुरू जाहल्या सरीवर सरी


वैशाली वर्तक

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

वृत्त आनंद ...प्रेम. आनंद वृत्तात

*प्रेम* रचना

वृत्त आनंद
गागालगा लगागा
   विषय ...पहिले प्रेम 
लगावली   गागालगा लगागा 

गागा लगा लगागा 

आली सहज समोरच 
अवचित नजरच जाता
आशा मनी उगाचच 
भरली मनात आता.


माझे मला कळेना
शोधू कसा बहाणा
पाहू कधी तुला मी
झालो  तुझा दिवाणा.

सांगू तरी पहातो.   
हे भाव अंतरीचे
  वाटे सहज कळावे  
.  बोल तु जला मनाचे.
         
            
वाटे तुला पहावे
 नयनी तुझ्या ठसावे
हे वेड जीव घेणे
केव्हा तरी वदावे

 सांगेन चार गोष्टी 
घेऊन हात हाती
ये ना समोर आता                    
होशील का ग साथी .               

वैशाली       वर्तक 
                                           

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

१५ **पावसाच्या कविता** (१६)षडाक्षरी तृप्त झाली धरा येरे घना येरे घना आज पाऊस थोडा आहे

वृत्त बध्द. आनंद वृत्त पहिले प्रेम

आणि *प्रेम* रचना

वृत्त आनंद
गागालगा लगागा
   विषय ...पहिले प्रेम 
लगावली   गागा लगा लगागा 

गागा लगा लगागा 

आली सहज समोरच 
अवचित नजरच जाता
आशा मनी उगाचच 
भरली मनात आता.


माझे मला कळेना
शोधू कसा बहाणा
पाहू कधी तुला मी
झालो  तुझा दिवाणा.

सांगू तरी पहातो.   
हे भाव अंतरीचे
  वाटे सहज कळावे  
.  बोल तु जला मनाचे.
         
            
वाटे तुला पहावे
 नयनी तुझ्या ठसावे
हे वेड जीव घेणे
केव्हा तरी वदावे

 सांगेन चार गोष्टी 
घेऊन हात हाती
ये ना समोर आता                    
होशील का ग साथी .                                                                   correct !!

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

वृत्त बध्द. विषय पहाट. उध्दव वृत

मात्रा वृत्त कविता उपक्रम क्रमांक ३
१२\१०\२५
मात्रा 2-8-4=14
वृत्त उध्दव 
विषय... पहाट 

तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती  सारे.   
किलबिलाट भासे सुंदर 
उठ ,प्रातः झाली प्यारे

पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ वाटे परिसर  सारा

घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू  येते.   
सुमधुर स्वरांची गाणी

आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई   मरगळ
मनाने आनंदती जन

क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी 
रामाचा गजर अंतरी
 भजन धून येते कानी              

वैशाली वर्तक

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

पावसाच्या कविता. . नको तो पाऊस

 विषय - विषय -  जा रे जा पावसा

वर्ल्ड व्हिजन पेपरात२९\९\२५


विषय -  जा रे जा पावसा

        
किती  रे बरसणार पावसा
परतीची झाली ना वेळ
बस कर तुझे पडणे
बंद कर बेभवशाचा खेळ.

बळीराजा  होईल नाखुष
अती वर्षावाने आता
मेहनत जाईल वाया
नको करू कष्टी जाता जाता
  
सुरू झाले नवरात्र 
खेळायचाय गरबा रास 
तुझ्या  पडण्याने पहा
मजा येत नाही खास

वेळवर न येता सदा
पळवितो तोंडचे पाणी
आता जायची वेळ झाली
 जाण्यासाठी गाऊ का गाणी ?

जा रे जा  पावसा  आता
आवर  मेघांचा पसारा
पुढल्या वर्षी भेटू  तेव्हा 
दाखव तुझा रंग न्यारा

झालय सर्वत्र  हिरवे गार
नको अती तुझा वर्षाव
रोग राई पसरण्या आधी
बस्तान  गुंडाळण्याचा कर प्रस्ताव


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


        




        



गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

चित्र काव्य ..... ये बाहेर पिंजऱ्यातून झालीय शिक्षित

काव्य 

आज झालीय शिक्षित 
मिळे सन्मानाचा हात
पण विचारांचा गुंता 
 कधीच सोडत नाही साथ

नव विचारांची पालवी
बहरली कल्पनांची चाहुल
मार्ग पण मिळताहेत 
मग का अडतेय पाऊल

माझे मलाच कळेना
 का मला  खेचते मागे
लोक काय म्हणतील
याचे का मनी विणते धागे

आहे माझ्यात विश्वास 
घेण्या भरारी गगनी
असता मनात उभारी
 का मी अडली  जीवनी

आदी काळापासूनची
काय वर्णावी महती
नव्हती  नारी अबला
सर्व जग ते जाणती

उघडून येतेच  वैचारिक पिंजरा
एकवटुन बळ सारे
 प्रगतीचे मार्ग धरिते 
 आहेत अलौकिक न्यारे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

तुझी वाट पहाते. पादाकुलक वृत्त. 8-8-8

होता गगनी.   तुझेआगमन .     मोदच वाटे.  
तम रात्रीचा. . दूर सारण्या.  वाट पहाते*

आशा रुपी.  कळ्यांची फुले( पुष्पें )  पहा सकाळी
खग किलबिलता  जणुची भासे    गोड भुपाळी

तुझ्या येण्याने.   वाहतील नव  चैतन्य वारे
सडे केशरी        अन् मंदावती   गगनी तारे     

तुज अर्ध्य देण्या    वाट पहाती.   रयत कधीचे 
तव येण्याने        पळून जाती     कष्ट मनीचे         


 येशील कधी   आकाशी तू        मजला वाटे     
तम निशेचा     सारण्याचे      कुतुहल दाटे

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव उत्सव

[27/08, 1:19 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच, पुणे 
आयोजित गणेत्सोव उपक्रमासाठी
उपक्रम क्रमांक 1
27/8/25
विषय...स्वागत गणाधीशाचे

 शीर्षक....आनंद सोहळा*

वेध लागे गणेशाचे
येता भाद्रपद  मास 
कशी करुया आरास
मनी विचार ते खास           1

 स्वागताला खास दारी
रेखाटली  ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी          2

ढोल ताशे वाजवित
केले स्वागत   आनंदे
*विराजले आधिपती*
मन भरले स्वानंदे                  3


रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत           4          


विराजले अधीपती      
पाहताच चित्ती ठसे 
 ऐटदार ते बसणे      
 मना मनातूनी वसे              5

अधिपती आले घरी
भक्त येती दर्शनाला
वाटे अपूर्व  सोहळा
येतो  हुरुप मनाला          6

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430
[28/08, 11:12 am] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित साप्ताहिक गणेशोत्सव अकरा दिवस उपक्रम 
दिवस दुसरा.  2
विषय.     करू आरास भक्ती भावे


लागलेच डोळे आता
तुझ्या  आगमना कडे
मनीं रचिते सदाच
कल्पनांचे आराखडे.

कशी करावी *आरास*
याचा करिते विचार 
करु काही नाविन्याचा
खास काही तो प्रकार

भक्ती भाव दाटे मनी
लवकर  या हो घरी
पहा केली सजावट
स्वागताला उभी दारी

ओवाळण्या तुम्हा दारी
रेखाटली  ही रांगोळी 
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी

झाली हो आगमनाची
मनाजोगी ती तैयारी
दावा रुप मनोहर
तुची आमुचा कैवारी

वैशाली वर्तक.....   
अहमदाबाद 
8141427430
[29/08, 11:18 am] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच, पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
उपक्रम क्रमांक      3
विषय ... आधुनिक बाप्पा 
शीर्षक..  बदल उत्सवात

येता मास भाद्रपद 
वेध लागती गणेशाचे
कशी करावी आरास
यात मन लागे सर्वांचे

काळा प्रमाणे घेऊ दक्षता
मूर्ती बसवू, स्वरूपीं कायम 
विसर्जित करू नियत जागी 
पाळता पर्यावरणाचे नियम


दिसणार नाही आपणास 
छिन्न विच्छिन्न रुप गणेशाचे
 राहतील जलाशय  स्वच्छ 
रक्षण होईल जलचर जीवांचे

 होतो श्रींच्या आगमनाने,   
 आनंद हे तर आहेची खचित 
  पण जोरात वाजविता वाद्ये
 आवाज प्रदुषण नसे उचित 
  
  हेच सारे घेता ध्यानी
  करण्या उल्हासात  सोहळा
  *आधुनिक  गणपती उत्सवा*
  सारे जन झाले पहा गोळा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[30/08, 11:27 am] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव अकरा दिवसांचा
चौथा दिवस     4
विषय - एक मागणे मांगल्याचे 
शीर्षक.... देवा तव चरणी 
अष्टाक्षरी रचना
        

 श्रीगणेशा मिळे  मज
सुखानंद अविरत
*देवा तुझ्याच चरणी*
अनुभवे मी खचित

दूर होती सा-या चिंता
जाते शंकेचे मळभ
मिळे मना सुख शांती
कामे होतात सुलभ

 येता प्रसंग कठीण
तूच असता तारक
धाव घेती तुझे पायी
तूची विश्वाचा पालक

घेता तव नाम ओठी
दुःखे  होती दूर  सारी 
देवा तुझ्याच चरणी
भासे मज जादू न्यारी

देवा तूची मंगलकर्ता
आले मी तव चरणी  
 मज दे तव आशीष
हीच करिते मागणी   

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[31/08, 12:36 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस ३१\८\२५.       5
विषय . बाप्पा सद्बुद्धी द्या ना

तव नामाचा महिमा
आहे जगती अपार
सुखदाता दुःख हर्ता
तूची विश्वाचा आधार

चौदा विद्या अवगत 
तव महिमा अपार 
दे सकळा सद्बुद्धी 
तुज म्हणती मंदार 


असे प्रथम पुजेचा
सर्व देवातही मान
मागतो मी सद्बुद्धी 
करुन तव सन्मान 

वेद सिद्ध, एकदंत 
रणांगणी धुरंधर 
तुझा जीवनी आधार 
ठेव कृपा निरंतर 

देवा तूची विध्नहर्ता
आले मी तव  चरणी
मज दे सद्बुद्धी आशिष 
हीच करिते मागणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[01/09, 12:17 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस सहावा    6
विषय ... बाप्पा ऑन ड्युटी 
शीर्षक.  *सतत कार्यरत असशी*


खरच आहे  रे बाप्पा 
 काम करीशी अविरत
तुला ना झोप विश्रांती 
सतत रहातो कार्यरत

तूची कर्ता करविता 
तुला नसे कधी सुट्टी 
जगताचा तू अधिपती 
सदोदित तू ऑन ड्युटी 


 तुच निर्मिले सूर्य चंद्र 
 होई दिन रात नित्य
  तूझ्या कृपेने ऋतू चक्र
 सांभाळी जगाला हेच सत्य


जरा येताची प्रसंग बाका
आमुचा दृढ विश्वास तूजवर
हाक देता येशी, तूची धावूनी 
दुःख दूर करण्या खरोखर 

तूची असशी तात मात
सर्व जगाचा तू पालक
आनंद देण्या सुख घेण्या
आम्ही होतो तुझे बालक

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
8141427430
[02/09, 4:06 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस सातवा.     7
विषय ... बाप्पा ला डी जे चा  त्रास 
   शीर्षक..नवा बदल घडवू


चला जाऊ श्रींना आणू
शब्द  हे येताची कानी
झांज घेऊनिया हाती 
असेच चित्र येते ध्यानी.


पांघरुन श्रींना शेला
दारी उभी असे आई
 गणेशच्या स्वागताची
औक्षणाची तिला घाई.


मंद स्वरात शहनाई 
 भासे किती प्रसन्नता  
नको वाटतो कर्कश्य 
बंद करा डिजे आता

आवाजाचे प्रदुषण
 सहनच होत नाही 
शांत सुरात ऐकावे
 याची वाट पहात राही

योग्य करूया बदल
त्रास होतो गणेशाला
नको डिजेचा  आवाज
सनईचे सूर आवडे श्रीला

सुंदर बहरली सृष्टी 
नको कसलेच प्रदुषण 
मोठ्या मोठ्याने गाणे वाजवणे
ध्वनीने बिघडे पर्यावरण 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[03/09, 12:09 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 








अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस .आठवा
उपक्रम क्रमांक 8,       8
विषय... दहा दिवसांचा पाहुणा 

शीर्षक. आनंदाचे  दिवस 


  येता गणराज घरी
 आनंदाचे दिन सारे
उत्साह ओसंडून वाहे
 चैतन्याचे वाहती वारे

आप्त जन येती घरा
गप्पा गोष्टींना चढे रंग
ताई माई सर्व नारी
नटण्या मुरडण्यात दंग

दहा दिवसांचा  पाहुणा 
नावच त्याचं सुखकर्ता 
पळवून देतो मरगळ 
असेच तो विघ्नहर्ता 

येतो  पाहुणा म्हणून 
खाण्यात होते चंगळ
रहाना जरा जास्त दिन
लंबोदरा तू किती रे प्रेमळ

  घर पहा भासे खरच!
आनंदाला आले उधाण
 मग्न भावे करिता भक्ती 
  मिळे  आगळे समाधान 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद



काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव उपक्रम 
*दिवस नववा*.        9
दि 4/9/25
विषय ... *बाप्पांच्या नैवेद्याची गोडी* 


येता गणेशजी घरी
नैवेद्याची चंगळ भारी
 मंडल करून दाविता
नैवेद्याची  गोडीच न्यारी

पंच खाद्यचा लघुनैवेद्य 
 अपर्ण  भक्तीभावे करिता
गणेश  वाढवे गोडी खास
तोची असतो ना कर्ता करविता 

मोदक लाडू करंज्या 
सर्वात एक  चव आगळी
फळे पण लागती नेहमीची
पण नैवेद्याची चव वेगळी 

भक्ती, श्रध्दा,प्रेम युक्त 
अर्पिता नैवेद्य गणेशाला
 प्रत्येकास  वाटून  खाता
 गोडी वाढते प्रसादाला

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस दहावा.              10
दि 5/9/25
#####################
विषय ... बाप्पा ला काही सांगायचे आहे
शीर्षक...चुका करितो मान्य 



शरण आलो तुला भगवंता
झाल्या चुका आमुच्या अपार  
वृक्षारोपणाने वाढवू वन संपत्ती  
पर्यावरण कडे लक्ष देऊ फार 


कायम स्वरुपी आणू मूर्ती 
 मातीचीच ठेवू पूजे साठी
छिन्न विच्छिन्न न दिसण्या
काळजी घेऊ सदा साठी

विसर्जनाचे करूनी हौद 
 घेवू काळजी जलाची
जलचरांची राखू निगा
दक्षता घेऊन निसर्गाची

हेच सांगायचे होते तुला
नको रागवू तू आम्हावर
अजाण सारी तुझी बालके
तूची आहेस विश्वंभर 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


वेळ विसर्जनाची*.                  11

गणपती आले म्हणता म्हणता
आले की हो विसर्जन 
किती आनंदाचे होते क्षण
सरले दिन भरकन

रोज एकत्रित  आरती
वाटे आनंदाचा सोहळा
भजन, मंत्र -जागर  स्तवन
करण्या आप्त जन होती गोळा


मोदक लाडू पेढ्यांची
होती वेगळीच शान
खाणे, गप्पांना आले
खास आनंदाचे उधाण.

पण, आता म्हणता आरती
डोळे पहा पाणावले
लहान मुलांना सावरता
मोठे जन पण रडावले

 बाजुला शिदोरी ठेवीता 
बाप्पा ssबाप्पा मोरया
शब्द  ते  आले ओठी  
*पुढल्या वर्षी लवकर या

*निरोप तुला देताना*
मन  होतंय उदास
उत्साहात सजविलेले मखर
उद्या  भासेल भकास



वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

वृत्त बध्द कविता पाऊस. आनंद वृत्त

गागालगा गालगागा 


विषय ...पाऊस 

केला सहन उन्हाळा 
कोमेजली शिवारे
केव्हा पडेल पाणी 
वाहील थंड वारे

आले भरून अंबर
आनंदले मनाने
येतील थेंब आता
पाऊस तो क्षणाने

आलाच तो पहाना
आतुर मना जरासा
पाहून मेघ गगनी 
जीवास तो दिलासा 

तृप्त धरा बहरली
माती पहा अंकुरली 
रानफुल हसून फुलली 
तृणांकुरे पसरली.

का रे अतीच येतो
तू थांब ना जरासा
काहीच का कळेना
झालाय तू नकोसा

तुझ्या वरी बळी तो
लावून आस राही
आहेच तू खट्याळच
वेळेत येत नाही 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

लढा तरी किती द्यावा

लढा तरी किती द्यावा

मर्यादा त्यास का नसावी

करा मर्यादित लढा मग

उत्कर्षाची कास न धरावी


जीवनच  असे एक लढा

हे तर आहेची सदा खरे

 होते , लढा दिल्यावरच 

प्रगती जीवनी हेच सत्य खरे


पहा आयुष्य श्री कृष्णाचे

जन्मा पासून लढा सुरू 

पण आयुष्य जगलेच ना!

अखेरीस ठरले जगतगुरु .


थांबला तो संपला  म्हण

आहेची सदासाठी उचित 

मर्यादित करिता लढा

प्रगती खुंटते हे खचित


साधे फुल गुलाबाचे

किती  साहू लढारुपी काटे

 मान फुलांच्या राजांचे मिळे

नको लढा तया , मनी न वाटे


दगडाला पण मिळविण्या देवत्व

साहितो टाकीच्या लढ्यांचा संघर्ष 

 जीवनात येणारे लढयासाठी

सहजच ध्यानात ठेवावा निष्कर्ष 


पहा आपले पंतप्रधानजी

 लढे झेलीत  संघर्षांने

प्रेरणा देती सर्व जगाला 

कसे जगावे सहर्षाने


वैशाली वर्तक

लढा तरी किती द्यावा

मर्यादा त्यास का नसावी

करा मर्यादित लढा मग

उत्कर्षाची कास न धरावी

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

मनोरमा वृत्त ..... आनंद वृत्त ट

गा  ल गा  गा  गा ल  गा  ग समूह आयोजित 
स्वतंत्र्य दिनी विशेष  वृत्त बध्द चारोळी लेखन स्पर्धा 
स्पर्धा क्रमांक 44
विषय.   स्वातंत्र्यदिन 
वृत्त.   मनोरमा 
लगावली.... गालगागा गालगागा 

गा ल  गा  गा   गा  ल  गा  गा 

आज स्वातंत्र्यास आता 
 आगळी ती शान आहे 
भारताच्या गौरवाचा  
वेगळाची मान आहे

वैशाली वर्तक 
गालगागा गालगागा

रोज काही सांगते ना
दोन गोष्टी जीवनाच्या
 सवय झाली नित्य नेमे. 
बोध घेण्या जीवनाच्या


####################################
खेळ थोडा वेळ देना
.  काळ जातो  चालताना. 
 बोलणे ते राहिलेना 
थांब थोडा बोलताना 

अंतरीचे शब्द माझे 
सांगणे ची  होत नाही
शांत  समयी    कोण जाणे 
  सांगण्याची वाट पाही

वाट पाहूनी पहा ना
रात सारी सरत आली
पण तुलाची   खंत नाही 
परतण्याची वेळ झाली 

 पूर येता भावनांना
प्रेम माझे  मीत झाले
चांदण्यांची  रात होती 
 सूर.     गीत आले

###################
[19/08, 10:35 am] Vaishali Vartak: गालगागा गालगागा 

माळरानी चालताना 
मौज वाटे आपल्याला 
खूप सारी  पुष्प  होती 
 डौलणारी  स्वागताला
वैशाली वर्तक
[19/08, 10:43 am] Vaishali Vartak: गालगागा गालगागा 

धून चाले रामनामे 
दर्शनाची आस आहे 
राघवाचे नाव ओठी
राम माझा श्वास आहे

गालगागा गालगागा 

देव आहे सर्व जागी
नाम घेता देव येतो
भक्ती गीते गात जाता
जीवनाचे सार देतो
वैशाली



[18/08, 11:01 pm] Vaishali Vartak: देव 
मनोरमा 
गालगागा गालगागा 

देव असता संगतीला 
कोण मजला  मारणारा 
सांगतो मी आज सर्वा
देव आहे तारणारा

 : देव कर्ता करविताची
तोच   वाहे भार साहे
आपुल्या या जीवनाची
शान तोची जपत  आहे

: देव कृपेने जगी या
रात्र ऊषा होत आहे 
निसर्गाची जादु त्याची
आपणाला दिसत आहे
[: गालगागा गालगागा 

माळरानी चालताना 
मौज वाटे आपल्याला 
खूप सारी  पुष्प  होती 
 डौलणारी  स्वागताला
वैशाली वर्तक
[19/08, 10:43 am] Vaishali Vartak: गालगागा गालगागा 

धून चाले रामनामे 
दर्शनाची आस आहे 
राघवाचे नाव ओठी
राम माझा श्वास आहे

गालगागा गालगागा 

देव आहे सर्व जागी
नाम घेता देव येतो
भाव पूर्ण गात जाता
जीवनाचे सार देतो
वैशाली








#####################################
आनंद वृत्त 
: वृत्त. आनंद 

गा गा ल गा.  ल गा गा
विषय पाऊस 

झाले पहा कसे ते
आकाश दाटलेले
काळ्या नभी शशीचे
मुख पार झाकलेले

वृत आनंद 
विषय पाऊस 

गागा लगा लगागा
नाही नभांगणी त्या
नावास चांदण्याही
काळीच रात्र आहे 
  पाऊस  मात्र नाही 

वृत्त.  आनंद 
विषय पाऊस 
गागालगा लगागा

आले पहा जलाचे   
बिंदू टपोर मोठे   
पाऊस आज आला 
जाऊ नकाच कोठे
 
गागालगा लगागा 
विषय पाऊस 
गागालगा लगागा 

केला सहन उन्हाळा 
कोमेजली शिवारे
केव्हा पडेल पाणी 
येतील थंड वारे
वैशाली वर्तक

बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

वृत्त बध्द कविता लेखन. वृत्त मनोरमा


विषय मन
मनोरमा वृत्त 
गालगागा गालगागा 
काय वर्णू    मन कसे ते
सांगणेची  कळत नाही.   
दु:ख होते    सहजतेने
कारणेही    पटत नाही

होत आहे त्रास जीवा
कष्ट होता  मन उदासी
 देवपूजे.   शांति लाभे
साथ  देण्या   पुण्य राशी

झाल काही मोददायी
लाभते की सौख्य मना
बोलवित होते सुखांना
आज पाही त्याच क्षणा लेखन

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

महिमा बचतीचा

थेंबे थेंबे तळे साचे 
ठेवा सदा ध्यानात 
रोज  रूपया बचत करिता 
मोठी रक्कम होईल भविष्यात.


लहानपणीच अंगिकारावी 
बचतीची  सवय नित्य
 भविष्यात मोठ्या खर्चसाठी 
कामास येते हेच सत्य 

अशीच लागते सवय
फालतु खर्च टाळणे
उद्याच्या खर्चाची  सहज
 बचतीने तरतूद करणे .

बचत येता कामास 
किती वाटते हायसे
आजची केलेली बचत
 खर्च  रक्कम काढते अनायसे


 मुंग्या पहा ना कशा 
अन्न कण करतात गोळा
पावसाळ्यात पाणी सर्वत्र 
अन्न कोठारात करी सोहळा

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

ठेव. सिंगापूर शब्दगंध

ठेव 




 बालपणी पुस्तकातील 
मोरपीस, पिंपळपान 
चॉकलेटच्या चांदयाची
आगळीच ठेवेची शान

थेंबे थेंबे तळे साचे 
बचत करून ठेव पैका
भविष्यात येतो कामी 
बचतीचा महिमा ऐका

आई बाबांचे संस्कार
दुसरी अमुल्य ठेव
जीवनात येते कामी 
ज्याचे कौतुक एकमेव 

 बालपणीची संस्काराची  
  पूंजी मानितो मी ठेवी समान
   तिच्या बळावर सदा जीवनी
  मिळविला मान सन्मान 

संस्काराने सुसंस्कृत 
होतो आपण विद्यावान 
नसे चोरी भय विद्या ठेवीस
 खर्चताही  वृध्दी वेगवान 
 
ठेव वाढवावी नित्य
सत्कर्माची   जीवनात 
पुण्य  संचित कर्माने
 जाते आयुष्य आनंदात 


 आठवणींची पूंजी
अतिशय महत्त्वाची
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायची


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

बुधवार, २३ जुलै, २०२५

लेख...माझा साहित्य प्रवास

माझा साहित्य प्रवास 

  तशी मी तरणपटु व सर्वीसच्या दृष्टीने पहाता बँकर ..पण सर्वीसमधे असताना.   कधी कधी भगीनी समाजात जेव्हा स्पर्धा असत तेव्हा स्पर्धेसाठी जायचे स्पर्धेत भाग घ्यायची खुमखुमी आली.
  म्हणी लेखन स्पर्धा.. एकदा निबंध स्पर्धा  सहजीवन विषयावर.  तर अजून काही विषय लिहीता व बक्षीस मिळता गोडी वाढली. मग चिठ्ठी उचलून वक्तृत्व करणे, असे करता करता लिखाण हातून घडू लागले. पण तितकेच.
     पुढे निवृत्त काळात मोबाईल आले. सकाळी स्वतः च्या घरातील फुलांचे फोटो मैत्रीणी शुभ सकाळ नावाने टाकू लागल्या. तर त्या फुलांना पाहून माझी लेखणी सरसावली. त्या फुलांना समर्पक चारोळी लिखाण माझे सुरू झाले. फुलांना पाहून मला सहजच विचार कल्पना सुचायच्या .खरं त्या चारोळयांत तेव्हा, दुसऱ्या व चौथ्या 
ओळी अंती यमक पण नसायचे. पण नंतर मी फेसबुक वर आले.
व रोज उद्या च्या सकाळची चारोळी रात्रीच तयार करून ठेवून , सकाळी उठता "शुभ सकाळ " म्हणून चारोळी टाकू लागले .मग त्यात भर म्हणजे मी ती  चारोळी चित्रावर  टाकू लागले . 
Photo aapp च्या साहाय्याने माझे सचित्र चारोळी लेखन वाचकांना आवडू लागले  लाईक वाढले... प्रतिसाद वाढले. आणि मग यमक साधणे. योग्य शब्द वापरणे यात लेखणीस धार येत गेली. यमक सहजच ओठी आपसुकच येऊ लागले.
     त्यात सिंगापूरच्या शब्दगंधने दर महिन्याला २\३ विषय देऊन मला लिहीते केले.
त्यांच्या मासिकात पण लेख प्रकाशित होऊ लागले.
     त्यात *शब्द अंतरीचे* या समूहावर मला भास्तेने    केले .प्रथमच तेथे अष्टाक्षरी 
लेखनाचे नियम समजविले. आणि स्पर्धेसाठी रचना पाठविली. आणि काय सांगू !
अरूषी दाते परिक्षक होत्या. मला लक्षवेधी प्रमाणपत्र  मिळाले. जीवनातले पहिले साहित्यिक लेखनाचे पारितोषिक.
     तसै भगिनी समाजात सहजीवन विषयास मिळाले  होते.पण हे *शब्द अंतरीचे* फेस बूक राज्यस्त्तरियचे पहिले प्रमाणपत्र .. मग काव्यांजली, व पुढे तर अभंग दशाक्षरी, सहाक्षरी , गीत लेखन शिकता शिकता  लेखणीला धार आली. प्रणाली ताई म्हात्रे यांची चाराक्षरी चे online  कार्यक्रमात ,मी नियमित लिहीणारी मला अध्यक्ष  म्हणुन मान  दिला होता.
         पुढे तर *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या* कवी कट्टा वर बडौदा ,यवतमाळ वर्धा ब-याच  ठिकाणी संमेलनात काव्य सादरीकरणात हजेरी लावली.  मुलांनी माझ्या नकळत अंतर्मन "चारोळी व कविता" संग्रह प्रकाशित केला.
        फेस बुक वर ,WhatsApp च्या  अनेक समूहावर स्पर्धेत भाग घेत अनेक पारितोषिके मिळवली. मायबोली वर, प्रतिलिपी वर पण लिखाण करते.बेंगलोर कवि कट्ट्यावर पण लेखन केले आहे.
       माझ्या स्वरचित गीतांचे कवितांची गाणी utube. वर अनेक आहेत. योगायोग असा की एका मुलाने. स्वरबध्द व त्यानेच पेटीची साथ,तर दुस-या मुलाने तबलासंगत केली तर सूनेने गायली आहेत. अशी १०\१५ गीते utube वर झळकत आहेत.
आता लेखन तर छंद जडलाय. सिंगापूर च्या शब्दगंधात तर गेल्या वर्षी मी कविता लेखनची कार्य शाळा पण घेतली.असो.
        तरी अजून मी विद्यार्थीनीच आहे. अजून रोज लेखन व्हावे अशी इच्छा आहे.
पण एक सांगायचे तशा २\५ गझल लिहील्यात पण गझल काही जमत नाही. आणि वृत्त बध्द कविता लिहीण्याचा प्रयत्न करत आहे ते जमेल वाटते .
असो मायबोलीचे प्रेम मला सतत खुणावते.लेखनघडविते

गुरुवार, १७ जुलै, २०२५

कल्पना विस्तार

उपक्रम 
विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र आयोजित उपक्रम 
दि १६ व १७ जूलै २०२५
कल्पना विस्तार 
विषय.....एखाद्या खोटे बोलणे लगेच समोरच्या व्यक्तीला समजले असते तर?


   खोटे बोलणे ही मनाला जडलेली सवय असते.  वेळीच नाही सुधरवली तर, मग ती सवय अंगवळणी पडत जाते.  इतकी सहजतेने स्विकारली जाते की त्यात त्याला काही वावगे वाटत नाही.
असेच झाले एकदा.  कमलाबाई खोटे  बोलण्याची सवय होती उद्देश काही नसायचा, फुशारकी वा थापा मारणे. त्यांचे खोटे कसे उघडकीस आले पहा.
         विजया व मंजू मैत्रिणी... रहायला जवळ जवळ होत्या. दोघी बराच वेळ गप्पा मारत सोसायटीच्या बाकावर बसल्या होत्या. कमलाबाई तेथूनच पसार होता होता जरा थांबली. दोघी च्या रंगलेल्या गप्पात उगीचच मधे मधे करू लागली. 
आणि सांगू लागली की  सोसायटीत सुंदर गाण्याचा कार्यक्रम  होणार आहे. मला त्यात
 कदाचित निवेदन करण्यास सांगितलं . 
       अगदी खोटी बातमी, पण ती स्वतः चेच खरे पटवून देत राहिली. तिला काय माहित नव्हते , की विजया कमीटीत आहे. तिला सोसायटीच्या सर्व कार्यक्रमाची
तपशील वार माहिती असते. पण माहित नसताना, खोटे बोलणे अंगवळणी पडलेले 
. आणि विजया कमीटीत आहे याची जाणीव नसता सवयीप्रमाणे खोटं बोलली.
          पण  मंजुला कमलची  सवय माहित होती. तिने विजया कमीटीतील सदस्या आहे . तर तुझे खोटे बोलणे उघडकीस आले. आता तरी उगाचच थापा मारणे. सोड.
 सहजच कमलबाई वरमली. व मी जाते ग! मला काम आहे म्हणत निघून गेली.
  खोटे बोलण्याची फजिती झाली.

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

मंगळवार, १५ जुलै, २०२५

सहा शब्दांची कथा

विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र आयोजित उपक्रम 
दि १४\७\२५
उपक्रमाचे नाव. ...सहज शब्दांची कथा लेखन उपक्रम 
विषय..

संवाद....   माझा चेहरा पाहूनच, संवादाची गरजच  नुरली.

संधी. ..  .    एकदा हाती आलेली संधी ,  सोन्यासम असते

वादळ...  मी पाऊल टाकले ,वादळापूर्वीची शांतता जाणवली.

रात्र.  ...  पहिल्या रात्रीतच  नव ‌दांपत्यांचे सहजीवन संपले.

किमया.   मृगवर्षाची किमयाच  अशी, अवनीची  कायाच बदलली.

ओळख...  उत्तम व्यक्तिमत्व  हीच पंतप्रधानांची  ओळख ठरली.
                

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १४ जुलै, २०२५

कैवल्य \. वैभव शब्दावर चारोळ्या

जगतात   जीवन सारे
 पण अर्थ  हवा जगण्यात
कैवल्याचा विचार करा
तर जगाल  आनंदात

पुनरपि जनमम पुनरपि मरणम
हा तर मंत्रच जीवनाचा 
पण मिळविण्या कैवल्य 
अभ्यास करा गीता बोधाचा

श्री कृष्णाने पार्थास
रणांगणावर दिला बोध 
त्यातून कळले जनांना 
कसा कैवल्याचा घ्यायचा शोध 

अध्यात्मिक व्याप्ती 
असते कठीण काम 
कैवल्या साठी तर
नाही नुसते तीर्थ धाम

ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी 
आहे गीतेचे सार
प्राकृत भाषेत  वर्णिलाय  
कैवल्याचा मार्ग छोट्या   ओव्या आहेत फार 

: कैवल्य मिळविणे
असतेच  कठीण 
नको उतार वयात अपेक्षा 
नाही तर मिळतो जन्म नवीन 

 आहे ना आजचा
किती कठीण विषय 
जीवन जगता कैवल्यचा
लागेल आशय

आत्म मुक्ती साठी
हवी अध्यात्मिक जोड
कैवल्याचा मार्ग  तितका 
वाटतो पण नसे गोड


छान सांगितले तुम्ही 
  आध्यात्मिक बैठक हवी
पण प्रलोभने इतकी
की रोज नवीन नवी

: विठु कैवल्याची मूर्ती 
युगे अठ्ठावीस ऊभा
.
: वाचली ज्ञानेश्वरी
भक्तांचे प्रकार 
वाचता वाचता 
येई मनी कैवल्याचा विचार 

 मोक्ष प्राप्ती म्हणजेच 
मिळणे मार्ग कैवल्याचा 
पण नसे तो सहज
अती काटेरी दुर्गम काट्यांचा

 वृध्दकाळात विचार 
कैवल्याचा मनी
जीव होतो घाबरा 
काय  होणार पुढच्या क्षणी

 नेहमी कर्म माना देव
करूया सत्कर्म सदा
मग कैवल्याच्या मार्ग 
अवघड नसे कला

करतात का खरेच 
कैवल्याची अपेक्षा 
बोलताना बोलतात 
 पुढल्या जन्मीची यापेक्षा

: षड रिपूंना टाळा
मग कैवल्य मार्ग सोपा
लोभ मत्सर हव्यास सोडा
आणि निवांत झोपा

किती लिहू कैवल्यावर
समजतच नाही 
एक एक विचारांची माळ
गुंफतच राही

 दर्शन घडता प्रभु रामाचे 
शबरीला मिळालेजीवन 
सार्थक कैवल्याचे
आनंदली मनोमनी

: कैवल्याचा मार्ग 
आहेची खडतर
मन हवे समाधानी
हेच संत सांगती खरोखर 

कैवल्याची गोडी 
लागली जिवाला 
समजावे भव सागर 
पार  करेल क्षणाला 
वैशाली वर्तक

: विठ्ठलाने भक्तीने
धाडले  पुष्पक विमान 
तुकोबांच्या साठी 
तोच असे कैवल्याचा मान
वैशाली वर्तक
जगा सदा समाधानी 
ऐका संतांची वाणी
वैभव भासेल जीवनी
गाऊया आनंदाची गाणी 

भारताचे वैभव समृद्धी 
ब्रिटिश लोकांना दिसली 
त्यांची साम्राज्य स्थापन 
करण्याची जिज्ञासा वाढली

संसार सुरू केला 
तेव्हा होती सामान्य स्थिती
कष्टाने मिळाले वैभव 
अन् आता सुखवस्तू परिस्थिती 

सुदामा गेला कृष्णाकडे
 वैभव पाहूनडोळे दिपले
अन् आणलेले पोहे
देण्यास मन काचरले

साधे चहा विकणारे
  मोदीजी पंतप्रधान
 त्यांचे बौद्धिक वैभव 
त्यांना यश देण्यात  ठरले वरदान

वैभव समृद्धी साठी
करावी लागते मेहेनत
 होतो वैभवशाली
कष्ट करिता अविरत 

आपली मराठी भाषा
आहे  वैभवशाली खूप
म्हणूनच ठरली अभिजात
 मराठी जनांना आला हुरुप

लेख मनोरंजन

मनोरंजन 
मनाला आनंद देते  ते मनोरंजन.    मनाला आनंद कितीss किती प्रकारे मिळतो ना  .! वाचन, कला, क्रीडा ,भटकंती, संगीत,  इव्हन व्यायाम, सिनेमा वैगरे  पहाणे.   ब-याच प्रवृत्ती तून मनाला आपण  रिझवू शकतो.
 मनाला रीझविणे,  मन आनंदित करणे कोणाला आवडणार नाही  त्यामुळे मनाला रंजन हवेच असते.. आणि मन असतेच चंचल ते तर नुसत्या विचारानेच त्याचे... त्याचे.  मनाने विचार करून मनोरंजनाची साधने शोधतच असते. 
        आता पहा. होता सकाळ ... सुंदर भक्ती रसाची भुपाळी ,भजन ऐकून मन कसे प्रसन्न आनंदित होते. तर    हे  झाले संगीत . एक माध्यम मनोरंजनाचे. जे नुसते आनंदच नाही तर खेदजनक  दु:खी मनाची निराशा दूर सारून  प्रफुल्लित आंनदी करते . 
  तसेच दुसरे मनोरंजन म्हणजे व्यायाम करणे. ज्यात क्रिडा प्रकारात स्वीमींग ,टेबल टेनिस indoor वा out door games  अनेक  प्रकार येतात.आणि.खेळ खेळून मन ताजेतवाने होऊन मनस्वी आनंद मिळतो.
आणि मस्त रंजन होते.
    वाचन... या वाचना सारखे दुसरे मनोरंजनाचे साधन नाही.  उगा का पुस्तकाला मित्र मानतात .जो ज्ञान तर देतोच  व मनोरंजन पण  करतो. 
  प्रवास हे तर प्रमुख प्रिय साधन  मनोरंजनाचे .म्हणून च तर ऑफीसेस  मधून LTC सवलत देतात की कर्मचारी  भटकून रिफ्रेश होउन पुन्हा कामास उत्तेजित होतात. व आनंदाने पुन्हा कामास जुंपण्यास तयार होतो.
          उन्हाळ्यात थंडीत  फिरणे हिंडणे याने मनाचे रंजन होते. म्हणून तर उन्हाळ्याच्य सुट्टी ची आतुरतेने जन वाट पहात असतात.
    एवढेच काय सण आणि उत्सव हे पण मनोरंजना साठीच असतात. धार्मिक हैतू असतोच पण त्या सण वारा मुळे मित्र , आप्तेष्टांना भेटून मन आनंदाने भरून येते.मग त्यात सिनेमा पहाणे. गाणे वादन नृत्य यांचे प्रदर्शन करून मनोरंजनाची भर होते,
    सध्या तर मोबाईल एक मनोरंजनाचे महत्वाचे साधन  . काय हवे ते मागा  गुगल महाराज सदैव हजर
आज काल तर मोबाईल वर ज्ञान माहिती, अनेक गेम ,ज्या मुळे एकटे पणा जिवंत नाही . अगदी तास तास 
वेळ मनाला आनंद देण्यात मोबाईल मागे पडत नाही.अगदी खाद्य पदार्थांची रेसिपी पासून सर्व प्रकारची माहिती वाचून मनाला आनंदित करते. 
  अरे आजच पहा आम्ही 2/3कुटुंब  एकत्रित होऊन मस्त गप्पा गोष्टी करत ... अनेक विषय हाताळले 
एक दुस-याचे विचार ऐकले तर कशी  मस्त मनोरंजक संध्याकाळ. पसारा केली. 
    उगा का म्हणतात आनंद भरलाय चोहीकडे इकडे तिकडे वर खालती  शोधा म्हणजे सापडेल.. मनोरंजन 
करण्यास नेहमी   काय करावे असा विचार करण्याची गरज नसते

मंगळवार, ८ जुलै, २०२५

ललित लेख. गुरु चरणी ठेवीतो भाव

शब्द रजनी कथा ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे 
आयोजित 
ललित लेख लेखन 
दि ८\७\२५
विषय ... गुरू चरणी ठेवीतो भाव 
शीर्षक.     मी अजुनही विद्यार्थी  

         येता जन्मा गुरू हा हवाच.आई असे आद्य गुरू.जिचे बोट धरूनी चालता
शिक्षण देणे सुरू.    .जसे होतो मोठे गुरू पदांची संख्या वाढत जाते. जीवनात अनेक गुरू लाभतात जे ज्ञान देतात व जीवन सुलभ करतात. 

येताची जुळूनी  । 
गुरू  कृपा योग ।। 
तो असे सुयोग
जीवनात |

   खरच  अगदी उचित कथन आहे.   वरच्या माझ्याच ओळी  मला आठविल्यात. शालेय जीवनात विद्या देणारे व त्याच बरोबर व्यवहार ज्ञान सहजतेने देणारे गुरू . त्यांच्या तर आपण आदर भाव ठेवून ....त्यांना वंदनीय मानून ज्ञान संपादन केले
म्हणूनच आपण जीवनात काही करु शकलो. , नुसतेच करु शकलो  नाही तर

गुरू कृपा योगे  । 
तरलो तरलो ।। 
आता  उध्दरलो।  
जीवनात  ।।           

  असे म्हटले तर काही चुकीचे नाही.
गुरू कृपेचा तो योग. आजही ते भाव मला आठवितात. त्यांची कृपा झाली म्हणून ज्ञानी झालो ,त्याचा आज आनंद वाटतो. ज्ञान संपादन करून भविष्याची वाटचाल सरळ सुलभ झालीच.. शिवाय संकटी. कठिण प्रसंगी पण कसे तरून जायचे ,बाहेर  निघायचे या ज्ञानाचा उपयोग झाल्याने, जीवनी दु:ख निवारण झाले.कुठल्या शंका कुशंकेला मनी थारा दिला नाही. 
   आणि हो ....नेहमी निशा नसतेच...  निशे नंतर उषा पण येते ...असे समजवित गुरू ची प्रेरणा, वेळोवळी कौतुकाची थाप ,हे सारे गुरूंचे मनी भाव अजूनही स्मरणात आहे.
            जीवनात गुरू शिष्य नाते चालूच रहाते. ज्याच्या पासून ज्ञान मिळते तो गुरू..
मग तो आपल्या हून लहान पण असू शकतो. 
         साधा किटक  कोळी पहा.. पण जिद्द असावी मनी तरच यश मिळेल ,काम पूर्णत्वास जाईल . हे  शिकवितोच ना! 
 तो कोळी चिकाटीने शंभरदा पडून जाळे  पूर्ण करतोच ना.? तर असे गुरू चे भाव मनी असावेत. निसर्ग पण गुरू शिकवितो कसे जगावे. तर
    
जीवनी शिकणे हे गरजेचे
तर वाढे  आपले ज्ञान .
विद्यार्थी अवस्था महत्त्वाची 
ठेवा सदा त्याची जाण.   
            असे म्हटले तर चुकीचं  ठरणार नाही.

     जाणूनी महिमा गुरूचा
     मिळण्या जीवनास आकार 
    विद्यार्थीनी मी रहाते सदैव 
    आयुला भक्कम आधार .

तर गुरू विणा नसे उध्दार  हे सदा भाव मनी ठेवावे .

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, ७ जुलै, २०२५

लेख घन ओथंबून आले

 ग्रीष्माच्या तप्त झळा अंगाची लाही करत होत्या. आदित्यराजे जणू आग ओकीत होते. सारी सृष्टी तप्त उन्हाने

कोमेजली गेली होती.गुरांना हिरवा चारा मिळत नव्हता.

मानवाच्या अती प्रगती च्या लालसेने सध्या वनराई पण कमी झालेली , त्यामुळे वृक्षेच सावली शोधत होती तर पथिक, गुरे यांना सावली कोठुन मिळणार. जो तो गर्मी ने हाशहूश करत ,आकाशाकडे पहात  बरस रे बाबा आता म्हणून आकाशाकडे नजर लावून बसला होता.

      वसुंधरा तर तापून तापून तिच्या मातीचा कणन कण तप्त झाल्याने शिवारात तील माती भेगाळलेली होती. व भुकेलेल्या बाल्यापरि परि तोंड पसरवूनी ममृग जलासाठी आसुसलेली होती . पण यंदा वरूणाची कृपा जरा लवकरच झाली ,6जूनला मृग नक्षत्र लागते पण यंदा आकाशात काळ्या मेघांची गर्दी दाटली .

बळीराजाला  पेरणीचीतयारी करण्यात घाई करावी लागणार या विचारात होता.

  गर्जत बरसत या मेघांनो 

   नको नुसती गर्दी गगनात 

   गडगडाटाने बरसा  रे

   काळी माय आसुसली शिवारात.

    सुरु झाला सोसाट्याच्या वारा, पक्षांना पण पावसाची चाहूल लागली. इकडून तिकडे पंख पसरून, उडु लागली. पाला पाचोळा पण जणु आनंदाने फेर धरून वा-या च्या तालावर गोल गोल गिरक्या घेत उडू लागला

आणि जलधारा नभातून बरसू लागल्या. मग


वाजवित ढोल ताशे 

मेघ राजा बरसला

नृत्य  दावी सौदामिनी

मोर आनंदे नाचला

  तप्त वसुंधरा पण तिच्या सख्यांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पहात होती . तिच्या वरुण सख्याला अलिंगन

देऊन तिची तृष्णा तृप्त झाली. आणि  वारा पण त्या आनंदात सामील होऊन आसमंतात मृद्गंध जणू पसरवत होता. सारी जन मन आनंदाने प्रसन्न झाली. जणू

           

चिंब झाली वसुंधरा

आल्या पावसाच्या धारा

ओल्या झाल्या वृक्षवेली

गाणी गात फिरे वारा


घन निळा बरसला मग हळूहळू  रिमझिम पाऊस धारा जलधारा बरसल्या. आसमंती गारवा आला जनांची गर्मीने होणारी जिवाची काहीली थांबली. 


मुले नाचती आनंदे

गात गाणी पावसाची

टपटप झेली धारा

माळ दारी  पागोळ्याची

     अशा रितीने जलधारा बरसून  घन ओथंबून आलेले आकाश रिक्त झाले.थंड वारा मस्त जिवाला सुखावत होता. वृक्ष वल्ली पाण्याने स्वच्छ धुवून निघाल्या होत्या.पानांवर तितकी जाणवित होती .शेवटी निसर्गाचे 

जलाची किमया आगळीच.



वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

शुक्रवार, ४ जुलै, २०२५

गझल भुजंग प्रयात पावसाचा दिन

 भुजंग प्रयात 

लगावली

लगागा लगागा लगागा लगागा 

पहाता पहाता कसा वेळ गेला

रवीने नव्याने पुन्हा खेळ केला


कुणाला  \जराही\ समजले\च नाही

दिवस की\ निशेचा\ मनी घो\ळ   केला


ढगाआ\ ड होता \तिमीरच\ पसरला

रवीने ढगांशी पहा मेळ  केला.    





वैशाली वर्तक

पहाता पहाता सकाळी 

 शलाका नभाचा पसारा पसरवी


गुरुवार, २६ जून, २०२५

आला आषाढ महिना ... ऋतू हिरवा

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित उपक्रम 
उपक्रम क्रमांक 596
विषय ...आषाढ महिना 
     
येता मृगाची ती सर
खुश होई  बळी  मन
मनी आतूर चातक    
आनंदती  सारे जन

येता महिना आषाढ 
सुरू पावसाच्या सरी
तृणपाती  डौलताना
मोद वाटे जन ऊरी.

 
बरसता जलधारा 
काम बळीला शिवारी 
लगबग पेरणीची 
आस वारीचीही भारी

देव्हाऱ्यात पाही विठू
मुखी विठ्ठल गजर
विठु भरला हृदयी 
 मनी  वारीत हजर


पाहताच  कृष्ण मेघ. 
कवी मनात कविता 
चिंब मन पावसात
शब्द  ओंजळी भरिता

 
असा आषाढ महिना 
कवी ,भक्त ,शेतकरी 
सारे  व्यस्त कामातून
आपापल्या घरोघरी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद.

साहित्य तेज पेपरात १५|९|२५

शीर्षक...ऋतू हिरवा*

झाली मृगाची बरसात
तप्त  अवनी तृप्त जाहली
दरवळला मृद्गंध आसमंती
वृक्ष  लता फोफावली


गरजत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी गगनात
गडगड करित बरसा रे
पेरणीची झाली वेळ शिवारात


वाहतील झरे खळखळ
भासतील शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस ते निसर्गाचे
गीत गाईल थंड मंद वारा


 बळीराजा खुश होईल
 काम करेल  शिवारी
 स्वप्न रंगवेल मनी
 गोड लागेल भाकरी


वाहता जल कडे कपारीतून
होईल रंग     धरेचा हिरवा
रानमाळ डोंगर सजतील
करु साजरा   ऋतू बरवा

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज


बरसला घन निळा 
 वाटे समाधान मना
दूर केली मरगळ सृष्टीची
सृजनता दिसे क्षणा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



रविवार, २२ जून, २०२५

पत्र लेखन विषय सांगायचे राहून गेले

विषय.      सांगावयाचे  राहूनच गेले !


  प्रिय सखी..,
     कशी आहेस.? बरेच दिवसांत काही पत्र नाही ,.तसे ही आता पत्र लेखन काल बाहयच होत आहे . तरी
आपण दोघी मात्र अजून महिना/दीड महीन्यात पत्र लेखन करून यथेच्छ संवाद साधतोच... नाही का ?
काय आहे फोन वर बोलून समाधान मिळते पण तरी लिहून पत्राद्वारे दिलेल्या , मग वाचलेल्या मजकुराची तर आगळीच मजा असते. 
     पत्र कसे! आठवण आली की पुन्हा वाचून रसस्वाद घेता येतो. फोन वर काय फोन ठेवला वा WhatsApp वर बोलणे झाले की संपलं.   लिहायला बसले की विचार सुचतात व इत्यंभूत सविस्तर माहिती देता येते.असो.
      अग मी आज काय  बोलणार होते...म्हणजे तुला लिहीणार होते. ते म्हणजे आमचा दर महिन्याला विविधा नावाचा , आमच्या बायकांचा एक समुह आहेना. तुला माहित आहेच मी बरेचदा तुला त्या बद्दल लिहिले आहे.  दर वेळी वेग वेगळा विषय देतात व त्यावर   सख्या भाष्य करतात .तर यावेळी त्या समूहावर  गंमतीदार विषय होता. *सांगायचे राहून गेले* . अग  मागच्या वेळी मी तुला त्याबद्दल लिहायचे राहूनच गेले. खूप मजा आली .प्रत्येक सखी तिचे तिचे किस्से रंगवू सांगत होती.आता आज तरी मी तुला 
लिहून सांगते .. नाही तर त्या विषया प्रमाणे माझं पण लिहायचे  व तुला सांगावचे राहूनच जाईल.तर मी
अशी सुरुवात केली की,
  आमची एक सखी होती. नाव तिचं निर्मला. निर्मला खूप बोलकी... अगदी अवखळ वहात्या झ-या सारखी बोलणारी .एकदा बोलू लागली की, तिला काय सांगू ?   किती बोलू असे व्हायचे ..अशी बोलक्या स्वभावाची वा  बडबडी .. तिच्या समोरच्या व्यक्तीला नेहमी श्रोताच व्हावे लागते .     
        सहज एकदा,.... एकदा  कसले? तिचे असे  अनेकदा  होते  .मैत्रिणीला वाढदिवसा  निमित्य शुभेच्छा देण्यास फोन केला . समोरचीने फोन उचलला.
   झाsss ले !  "काय ग काय म्हणतेस?बरेच दिवसात फोन नाही .नुसती म्हणतेस  की तुझी आठवण येते. पण कधी फोन करत नाहीस!  का कधी येत नाहीस ! कोठे भेटू म्हंटले तरी  नाही  असे उत्तर असतेच ,  ...असे म्हणत तिने जे  भाष्य  (बोलणे) सुरु केले की , तिच्या सर्व मैत्रिणी, त्यांच्या सासू , त्यांच्या  नातवंडांच्या....इव्हन शेजार पाजा-यांच्याबद्दल गप्पा झाल्या .पण फोन ज्या कारणाने होता ,त्या  बद्दल विषयच नाही .आणि मग गप्पा मारून  फोन ठेवला . थोड्या वेळानंतर लक्षात आले की,"अग बाई ! मी तिला फोन वाढ दिवसा निमित्य शुभेच्छा देण्यास केला होता . आणि ते तर मला सांगावयाचे राहूनच गेले ! मग काय पुन्हा पुन्हा  फोन लावला पण मग मात्र तिचा फोन सतत  व्यस्त येत होता. ..कारण  तिच्या सारख्या  तिच्या मैत्रिणीचे बरेच well wishers  होते ना!

         कित्येकदा असे होते, सांगायचे असते ते राहूनच जाते. हो, ती 'झी मराठी" वरची   " कुंकुं" सिरीअल होती  . जुनी ग ..तिच्यात  नाही का ? जानकीला... हिरोईन ला, तिच्या नव-यास   खूप काही सांगायचं असते , सांगणे सुरुवात करे पर्यंत वेळ जातो .तिच्या आईची तब्बेत ठीक नाही. तिला पैशांची गरज आहे. हे ती नव-यास कधी ची सांगण्याचा प्रयत्न करावयाची ,  पण दर वेळी काही कारणाने सांगावयाचे राहून जावयाचे असो,
  हो ! पण त्यामुळेच तर सिरीअल  लांबते ना ?.व आपणास मनोरंजन मिळते .तेव्हा  अशा व्यक्ति समाजात असतात की मूळ मुद्यावर  येता येत नाही .मग मनात हूर हूर करत बसतात 
       तशीच एक वेडी प्रेयसी ..  प्रेमात वेडी झालेली म्हणून वेडी बर का ! . प्रियकराला रोज भेटत होती .मला तू आवडतोस म्हणून सांगावयाचे रोज नक्की करावयाची , पण रोजच सांगावयाचे राहून जायचे. घरी येऊन  मनाशी म्हणायची , 
    इश्य  बाई ! आज पण नाही जमले. सांगायचे राहूनच गेले .शेवटी .प्रियकर गावीं जाण्यास निघाला  ती स्टेशनवर सोडावयास गेली .तेथे आता.. तरी पटकन बोलावे ना ! पण छे ,शेवटीं गाडीची सुटण्याची वेळ झाली .सिग्नल  मिळाला . ,गाडी हलणार शेवटी हातवारे करून  डम शो मध्ये करतात ना  तसे करून  I love you दाखविले . ठीक झाले ..प्रियकरास भावना तरी  पोहचल्या ..तो म्हणाला हा! हा! भा. पो  म्हणून ठीक झाले.  पूण्याचा कोड वर्ड  
भावना पोहचल्या.चा
आणि    तेव्हा पण तोंडाने सांगावयाचे राहूनच गेले !   
        आपण मंदिरात जातो. तेथे पण  असेच होते .देवाजवळ  काय काय मागावयाचे ते नक्की करतो. हो!   बाई देवच तर हक्काचा आहेना ! ज्याच्या जवळ सर्व मागण्या आपण मागू शकतो. व कुणास पण न  ऐकू येता , मनातील इच्छा प्रगट करू शकतो . पण भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून देवाजवळ मागावयास जावे तेवढ्यात ," ए चला पुढे व्हा ,गर्दी करू नका. पुढे  पुढे सरका." म्हणून पुजारी ओरडतो. व देवा समोर  उभे असता पुढे व्हाच्या धक्कयाने  .. दुसऱ्या कोणा व्यक्तीला डोळे
 मिटून हात जोडलेले असतात आणि *सांगावयाचे राहूनच जाते*.
     असो माझ्या सारख्या  बाकीच्या मंडळींना  सांगते, तुम्हास  पण काही सांगावयाचे असेल ते सांगून द्या.  पटपट लिखाण करा .नाही तर  मग मनात हूर हूर राहील की   पण........ सांगावयाचे( लिहावयाचे ) राहूनच गेले.
       असे माझे भाषण मी तुला लिहून कळविले. जे मी पण तुला मागच्या खेपेला लिहायचे राहूनच गेले होते... असो. .
   बरं झाले मराठी संवर्धन मंडळाने हा विषय दिला म्हणून माझे काम झाले.
 असो . 
्तुझ्या सासू बाईं मुले कशीआहेत .आणि तुझा नवरोबा. सारे मजेत आहात ना.
मी व  माझा नवरा मजेत आहोत .नातवंडे व मुलगा सून पण आपापल्या कामात व्यस्त व मस्त आहेत
चल पुन्हा भेट पत्र व्दारे. तोवर तू पण खुश व मस्त रहा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद .



 

कृपा पंचमहाभूतांची

जागतिक पर्जन्य वन दिन
दि 22 \6 \25
त्रिनेत्र प्रकाश धारी 
 विषय...ऊन .वारा,पाऊस.वणवा पंचमहाभूते वृक्षारोपण, वनसंवर्धन विषयावर काव्यलेखन 

 शीर्षक.. कृपा पंचमहाभूते 

 सुरु  होताची वैशाख
 भासे ग्रीष्माचा वणवा
आग ओकितो आदित्य
लुप्त होतासे गारवा

सृष्टी  दिसते उजाड
दिन येता ऊन्हाळ्याचे
सारी सृष्टीची हरिता
जाळितसे  ऊन  वैशाखाचे

वेळ आली आहे आता
वनांकडे देणे लक्ष
राने वने केली नाश
 वृक्षारोपणाकडे झाले दुर्लक्ष 

बरसत आहे सरीवर सरी
अलवार जणू रेशीम धारा
दिसते हिरवळ सर्वत्र
 जणू पाचूचा पसरला पसारा.

करा  तेव्हाच लगबग 
लावा आपापल्या अंगणी,
 रोपे  नाना पुष्प भाज्यांची 
 होईल पहा हिरवीगार धरणी.

लावता वृक्ष  सभोवती
वाढेल सुंदर पर्यावरण
शुध्द हवेचे  नियोजन
आरोग्याचे करेल वर्धन

वृक्षारोपण केल्याने 
मिळेल प्राणवायू  आपणाला
प्रगतीच्या नावे केलीय वृक्ष तोड 
 आता दुःख  होतय मनाला

फिरून येता रानमाळी
करी उल्हासित थंड वारा
देई स्फुर्ती तना मनाला
आनंददायी  निसर्ग सारा 

क्षणात आला *उनाड वारा* 
पहाता पहाता सुसाट झाला
खट्याळ, दावी खट्याळपणा
कशी सावरू मी पदराला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

शनिवार, २१ जून, २०२५

अपयश. (मुक्त छंद) सिंगापूर शब्द हार

शब्द सेतू 


अंतिम पाचवी फेरी
दि २२\६\२५
मुक्त छंद रचना 





अपयश

यश  मिळाले की,
यशाला  तर आनंदाने, कौतुकाने 
जातेच स्वीकारले.
आणि लगेचच पेढे वा मिठाई देखील वाटून 
आनंद सोहळा साजरा होतो हटके .

पण ,.....अपयश आले तर ,
तेही स्विकारताआले पाहिजे.
जीवनात संघर्ष सतत  चालणारच,
अनेक कठीण प्रसंग येणारच. 

काही सहज सुलभतेने उलगडणार ,
तर काही गंभीरतेने हाताळता पण,
नाहीच दिसत यशाची चिन्हे ,
आणि मग ,...अपयश  पदरी पडणार 
याची खात्री पण पटते.

पण अशावेळी ,जराही न डगमगता ,
हीच उद्याच्या यशाची पायरी समजून ,
आत्मविश्वासाने  उचलावे पाऊल .
कळत नकळत झालेल्या चुका घेत ध्यानी ,
दृढ विश्वासाने , मेहनत घेत पुढे चालता,
सामोरी लागते यशाची चाहुल.

जशी रोज ...नसे निशा, 
निशे नंतर... येतच ऊषा.
अपयशाने  न होता खच्ची,
आठवावी मनी .... ती,
तेनसिंगची एव्हरेस्ट सर करण्याची जीद्य,
अथवा,.. पहा,साधा मामुली किटक कोळीला,
अनेकदा पडूनही, जाळे विणतोच ना नेटाने ?

तशीच मेहनत ,जिद्द, सकारात्मक भाव ,
आणि महत्वाचा दृढ विश्वासाने,
अपयशाला , यशात सहजतेने करावे रूपांतरित .
अपयश शब्दातील , पुसून टाकुया "अप" शब्द.

बालपणी सापशिडीच्या डावातून
हीच शिकवण देण्यास,
 मायबाप ,बालकास   लहान असताना,
खेळायला देऊन बाळकडू पाजतात,
सापशीडी तील शीडी..
जीवनातील चढ.. हेच यशाचे चिन्ह.
साप गिळंकृत म्हणजे ..
धडा अपयशाचा,
आपोआप नकळत मिळतो ,आणि
अपयश पचवित शंभर आकडावर पोहचतात.
 अन् *अपयश* आनंदे स्विकारतात.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
साहित्य तेज पेपरात 28/6/25






सिंगापूर शब्दगंध 26/7/25
विषय...हार
 
शब्द ...हार आणि विजय 
चालतात घेऊन हाती हात 
यशाला मात्र आनंदाने कौतुकाने 
मिळते सर्वांकडून साथ.

उडती कारंजे आनंदाची
लगेच वाटून पेढे यशात
आनंद सोहळा करिती
जन  साजरा करी झोकात 

  पण झाली हार तर.        अपयश आले तर
जीवन एक संघर्ष असता
कठीण प्रसंगही येणारच
आले पाहिजे तेही स्विकारता.

असता जरी कठीण प्रसंग 
दिसे सहज यशाचे पाऊल 
पण हाताळता गंभीरतेने 
कधी न लागे विजयाची चाहुल.

अशावेळी न डगमगता
मानावी  आजची हार
 तीच उद्याची यशाची पायरी 
हवा दृढ विश्वास अपार 

उचला पाऊल आत्मविश्वासे
चुकांना घेत ध्यानात 
ऐकाल विजयाचा डंका
यशाचा पुष्प हार पडे गळ्यात 

कारण नसे , रोजच निशा
निशे नंतर येतेच ऊषा
न होता मनाने खच्ची
विजयाची मिळवा नवी दिशा 

बालपणीची सापशिडी 
खेळातून मिळे शिकवण
म्हणूनच पाजण्या बाळकडू
खेळावया  देती मोठे जन.

सापशिडीतील शिडी
दाखवी चिन्ह यशाचे 
सापे करिता गिळंकृत 
सहज दिसे अपयशाचे

असेच चाले जीवनात 
सदैव हार जीत चा खेळ
खेळ खेळता अंक शंभराचा
पोहोचण्यास जमवावा मेळ

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद26/7/25

जगुया संगीतमय जीवन

तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत 
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित 
त्रिनेत्र प्रकाशधारी 
भव्य दिव्य राज्यस्तरीय काव्य लेखन करंडक स्पर्धा  
साहिल तेज मघे. १८\९\२५


दि 21/6/25
विषय ...संगीत 
शीर्षक... संगीतमय जीवन


रंग सात इंद्रधनुष्यी
स्वर सात  संगीतात
सप्त वसती आरोही
अन् तेच अवरोहात .

जीवन जगा सप्तसुरांत
 घेत साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येई मजा जगण्याची.

येता रवी राजे नभी
ऐका सुरेल भुपाळी
होते मनही प्रसन्न 
सूर ऐकता सकाळी .

भजनात,  संगीतात
हवी साथ तबल्याची
साज चढवे बासरी
मजा वाढे गायनाची.

लय हवी संगीतात
खुलते गाणे खरोखर ,
पण , लय संगे ताल ही
धरावा लागतो बरोबर .

गाणे देई मना आनंद
भरु सप्त स्वर मनात
होता संगीतमय जीवन
व्यथा जाती दूर क्षणात.

दिवसाच्या अष्टप्रहरात                        
विविध रागांचे आहे महत्व,
ललत, तोडी ,मालकंस ,दरबारी 
शेवटीला भैरवी दावे प्रभुत्व ,

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद
                               







                                             

रंग सात इंद्रधनुष्यी
स्वर सात  संगीतात
सप्त वसती आरोही
अन् तेच अवरोहात

जीवन जगा सप्तसुरांत
 घेत साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येई मजा जगण्याची

येता रवी राजे नभी
ऐका सुरेल भुपाळी
होते मनही प्रसन्न 
सूर ऐकता सकाळी 

भजनात,  संगीतात
हवी साथ तबल्याची
साज चढवे बासरी
मजा वाढे गायनाची


लय हवी संगीतात

खुलते गाणे खरोखर 
पण लय संगे ताल 
धरावा लागतो बरोबर 


गाणे देई मना आनंद
भरु सप्त स्वर मनात
होता संगीतमय जीवन
व्यथा जाती दूर क्षणात


दिवसाच्या अष्टप्रहरात                        
विविध रागांचे आहे महत्व
ललत, तोडी ,मालकंस ,दरबारी 
शेवटीला भैरवी दावे प्रभुत्व 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


गुरुवार, १९ जून, २०२५

ऋण. ऋण जन्माचे न फिटण्याचे मायबाप

 

ऋण जन्माचे न फिटण्याचे



घेता जन्म मानवाने

नाते जडते कुटुंबाशी

माता पिता कुटुंब जन

मातृभूमी मातृभाषेशी


 ऋणी मी पण  सा-यांचा

 देणे लागतो गुरु जनांचे

माता पितांनी केले मोठे

सारे श्रेय कुटुंबियांचे


समाजाचे पण असती ऋण

ज्या लोकांत वावरलो

समाजाच्या गरजा पुरविण्या

त्यांचा मी ऋणी लागतो


मातृभूमी कुशीत जियेच्या

वाढलो घडलो कर्तृत्ववान

राहणार सदैव ऋणी तीयेचे

पूर्ण करू  स्वच्छतेचे अभियान 



फेडणे असेची अशक्य 

ऋण  माता पिताचे मजवर

 ईश्वराने दिधला मानव जन्म

ऋण तयाचे.  जन्मभर


वैशाली वर्तक

अहमदाबाद 



विषय  मायबाप 
काव्यप्रकार अष्टाक्षरी 
*जीवनाचे शिल्पकार* 


देवा सम मायबाप
जीवनाचे शिल्पकार 
घेती अतोनात कष्ट 
देण्या जीवना आकार 

मायबाप दोघे गुरू 
दोघांचेही योगदान 
त्यांचे कर्तृत्व महान
द्यावा नित्य नेमे मान.

ऋण आईवडिलांचे
फिटणार कधी नाही
कसे घडवू पाल्यांना 
हीच चिंता मनी राही.

मनी तयांच्या एकच
असे उत्कर्षाचा ध्यास 
पाल्य व्हावेत शिकून
कली-युगातील व्यास.

घाम गाळूनी श्रमाने
कष्ट साही अहोरात्र 
मुखावरी न दाखवी
मायबाप एकमात्र.

दु:ख झेली घरासाठी 
राहो कुटुंब सुखात 
हाच मंत्र ध्यानी मनी
विठु गजर मुखात.

कलाकार संबोधती 
प्रेक्षकांना  मायबाप
कला गुण प्रसंशिता
देती कौतुकाची थाप

तुकोबांचे विठुराया 
वसे सदैव अंतरी
तेची माझे मायबाप 
अन् माहेर पंढरी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

जीवनाचे शिल्पकार 

बुधवार, १८ जून, २०२५

चित्र काव्य उजळवू ज्ञान ज्योती


चित्र काव्य 
उजळवू ज्ञान ज्योती


झटुनिया करू यत्न
टाकुया प्रगतीचे पाऊल
उजळवू ज्ञान ज्योती 
लागेल यशाची चाहुल

साथ देत एकमेकांस
चला जाऊया शिखरी 
ज्ञान दीप उजळविण्याची
आस हवीच अंतरी.

खचू नका ,भिऊ नका
असेच सदाची जायचे
शेताची कितीही संकटे
क्षणभर न डगमगायचे.

मनी करिता निश्चय 
यश मेरू येईल समीप
जुळता वात ज्ञानाची 
देईल प्रकाश ज्ञान दीप 


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

मंगळवार, १० जून, २०२५

ओळ काव्य मन मोहना तुझी बासरी

विश्व लेखकांचे 
उपक्रम ओळ काव्यलेखन 
ओळ.    *मन मोहना तुझी बासरी*
पहा कडव्यात पहिली दुस-या  2रीतसेत 3... 3 चौथ्या त चौथी


*मन मोहना तुझी बासरी*
वेड लावी गोकुळाला
 चारा खाणे विसरती गायी (पाडसे)
  भूल पडे जन  मनाला

होता कृष्ण मय राधा
*मन मोहना तुझी बासरी*
गोकुळवासी  येती ऐकण्या
 कृष्ण नाम असे अधरी

गवळण राधा करिते
अविरत हरिचे चिंतन
*मन मोहना तुझी बासरी*   
 ऐकून कृष्ण बोलती कंकण 

कशी आवरु मनाला
मन गुंतते तुझ्याच अंतरी
भुल  पाडे या राधेला
*मनमोहना तुझी बासरी*
              
 वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
;

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...