मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१२

. बदल. ...\बदल कविता

                                                                  बदल
   ऑफिस  संपवून  मीरा व  मंजू  घरी निघाल्या .बस स्थानकला  आल्या .पाहतात तर काय! बस स्थानकच्या
समोरच्या दुकानात बायकांची ही  गर्दी!सर्व बायका गर्दी करून होत्या.काही जणींनी भल्या मोठ्या पिशव्यातून
जुने सामान  कोंबून आणलेले व  काही जणी नवीन वस्तूंचे  बॉक्स घेऊन  जातांना दिसत होत्या . हा काय प्रकार  आहे? तर मंजुचे लक्ष दुकानाच्या वर नवीन  लावलेल्या फलका कडे गेले .'' त्वरा करा .घरात बदल घडवा ,बदल करा . जुन्या कोणत्याही वस्तू देऊन नवीन खरेदी करा " खरच " बदल " ही  जीवनात हवी हवीशी वाटणारी बाब आहे ना !  त्यातून  सध्याच्या प्रगतीशील  वैज्ञानिक
काळात तर, चालू जीवन शैलीशी एकरूप होऊन चालावयाचे तर "बदल " हा प्रत्येकाला प्रत्येक  थरात  करावयास  हवाच . केशवसुतांच्या कवितेनुसार' जुने जाऊ द्या  मरणा लागुनी " त्या प्रमाणे जुने सोडून नवीनतेकडे  कल  वाढविण्याचा" बदल" केला पाहिजे . जुन्या वस्तूंना कुरवाळीत बसण्यापेक्षा  बदलत्या आधुनिक, अद्यतन  वस्तूंचे अंगीकरण केले  पाहिजे .कारण जुन्या वस्तू काळाप्रमाणे तितक्या प्रमाणात
सेवा देऊ शकत नसतात.असे असता त्यांचा मोह दूर करून  नवीनीकरण  करण्याचा बदल  केला पाहिजे.तेव्हा  दुकानात बायकांची गर्दी होती ती  रास्तच होती. कोणी जुनी भांडी , कपडे ,घड्याळे  तर टेप-रेकॉर्डर वगैरे देऊन    अद्ययावत वस्तू  घेवून जात होत्या .
   तेव्हा  '' बदल" हा जीवनात महत्वाचा हिस्सा आहे . अहो, ही पृथ्वी जिच्या पंचतत्वातून आपले
शरीर बनले आहे. तिच्यातच पहा ना रोजच्या रोज बदल घडत असतो.निसर्ग सृष्टी तर रोजची रोज
बदललेली असते.रोज रात्री आकाशात उगवणारा चंद्र, रोजच कले कलेने मोठा व लहान  होत असतो .व त्याच्या कलेप्रमाणे  सागरास भारती ओहटी येत असते .म्हणजे सृष्टीत पण नवे नित्य बदल घडत असतात . सूर्याच्या भ्रमणाने ऋतू बदलतात .सर्व सृष्टी बदलते .जसे वसंतात  नवी पालवी,वर्षात सर्व सृष्टी हिरवे गार वस्त्र
परिधान केलेली , तर ग्रीष्मात पिवळी झालेली , तर शिशिरात पानगळी .तेव्हा आपल्या अवनीत पण असा  बदल घडत असतो .आणि  त्या बदलामुळेच आपणास ऋतूंचा आनंद लुटता येतो.
     इतकेच काय, आपल्या जीवन चक्रात पण बाल्य, तारुण्य ,प्रौढ, व वार्धक्य असे बदल घडत असतात .व त्या त्या काळाप्रमाणे  आपल्या वागण्यात ,बोलण्यात पोषाखात , इतकेच  नव्हे  तर स्वभावात बदल घडतो.व हा बदल करावा लागतो आणि तसा " बदल"  केला तरच आयुष्य जगणे सुसह्य होते  व त्या बदलामुळेच वागण्यात  ''वा-याप्रमाणे पाठ फिरवावी, अथवा परिस्थिती वरून  "अंथरूण पाहून पाय पसरावे " व वेळेनुसार '' when we are in  Roam we must be  roaman"   अशा " बदल"या गुणर्धमावरून त्या स्वरूपाच्या म्हणी प्रचलित झाल्या आहेत .
    सध्या चाललेली " उंच माझा झोका " रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या मालिकेतून
काळात झालेला बदल आपण पहातोच .त्या काळातील स्त्री जीवन व आत्ताचे स्त्री जीवन यात  जमीन अस्माना  चा  काळाचा झालेला बदल आहे.हा काळा प्रमाणे घडलेला सामाजिक बदल आहे.त्या काळात समाज सुधारकांना असा बदल घडविताना कितीतरी त्रास सहन  करावा लागला .त्या काळाच्या लोकांकडून होणारी  स्त्रियांची कुचंबणा,त्यांच्यावरचे अत्याचार, त्यांच्या  जीवनाकडे पहाण्याच्या  दृष्टी कोन यात  बदल 
घडविण्याचे काम  समाज  सुधारकांना   करावे लागले.त्या  केलेल्या  व  समाजाने घडविलेल्या  बदलामुळे आजचे  स्वतंत्र विचारसरणी  तसेच सुशिक्षित स्त्रीयांचे जीवन दिसत आहे.
    तसेच  प्रौढ पिढीने पण तरुण पिढीकडे  काळाप्रमाणे पाहण्याचा दृष्टी कोन  बदलला पाहिजे आणि आता तर जागतीकरण झाले आहे व विज्ञानाच्या  प्रगतीने जगच जवळ आले आहे आपल्या आहारात, पोषाखात बदल झालेले  आहेत व त्या बदलाचे नुसते आगमन नव्हे तर  स्वागत पण झालेले  आहे.इतकेच नव्हे तर आपल्या सण, उत्सवात  जसे पोळा ,वड  पौर्णिमा ,नागपंचमी ,ऋषीपंचमी ,दिव्याची अमावास्या हे सण त्या त्या  दिवशी पशु ,वनस्पति, वस्तू वगैरेंच्या  उपकाराची ,त्यांच्या ऋणाची आठवण म्हणून साजरे करतो, त्याच बरोबर  mother's day , father's day ,frindship day ,valentine day  वगैरे पाश्चात्य  पद्धतीचे  दिवस पण कमी अधिक प्रमाणात साजरे होणे हा काळाप्रमाणे झालेला बदल आहे
    पर्यावरणाचा विचारकरता प्रदूषण थांबविण्या साठी, कायम स्वरूपी गणेशाची मूर्ती अथवा फक्त शाडूच्या
 मातीच्या बनविलेल्या  गणेशाच्या मूर्तींची स्थापना करावयास हवी .कारण प्लास्टर ऑफ प्यारिस  च्या
मूर्ती पाण्यात विसर्जित होत नाहीत.व श्री गणेशाचे छिन्न विछीन्न रुप पहावयास मिळते व मुर्ती बनवितांना
 वापरण्यात येणा-या रंगानी जलाशयाचे  पाणी पण प्रदूषित होते व जलचर प्राण्याची हानी होते. तेव्हा  सोसायटीच्या बाहेर ठेवण्यात येण्या-या मोठ्या पिंपातून , हौदातून गणेशाचे विसर्जन करणे हा बदल पण आवश्यकच आहे     
   तसेच साहित्यात,  नाट्य कलेत  पण बराच बदल   झाला आहे काव्यात पण यमक, छंद ,वृत्त या बरोबर    मुक्त छंदात काव्य रचना प्रचलित झाल्या  आहेत . तसेच वेळे अभावी संगीत नाटके जाऊन  आता  आधुनिक प्रकारची नाटके, व  त्या नाटकातून अभिनय बरोबर अंगविक्षेपाला पण जास्त महत्व देवून मनोरंजनकरण्याकडे  झालेला नाट्य रंग भूमीतील  बदल आहे 
    तेव्हा थोडक्यात  काय, बदल हा  जीवनात सर्व थरातून घडत असतो व तो  आनंद  देणारा  व आवश्यकच  












भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जळगाव
उपक्रमासाठी
विषय - जुनं ते सोन

    *शीर्षक...काळानुसार हवाच बदल*

खरे असे जुनं  ते सोन च
पण बदल हवाच जीवनी
काळ बदलता हवे परिवर्तन 
याचा ही  विचार  करावा मनी       1

रीती रीवाजात बदल
घडवून  आणलाच आपण
विज्ञानाची धरुनी कास
केले विचारात परिवर्तन               2

जुने आहेच ते सोने
संस्कृती नका विसरु जगती
सामाजिक सुधारणा मात्र   
घडविण्यात  हवीच प्रगती           3

आपलेच म्हणणे मांडणे
मुरड न घालणे जुन्या तत्वास 
जुने ते सोनं पटविणे
हा ठरतो खोटा अट्टाहास            4


जुने साहित्य  अभंग वाणी
वाचू  गाऊ आपण नेटाने
परंपरा टिकविण्यात पुढाकार
नित्य  नेमाने दावु जोमाने                5

  जुन्याच्या संगतीत बदल
  कधी वाटतो सदा हवा
  प्रगतीला देतो नवी दिशा
  जसा रोजचा सूर्य ची नवा.             6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...