शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

मन करा रे प्रसन्न

                 मन करा रे प्रसन्न.
     एकदा एका लग्नाची मिरवणूक  चालली होती. नवरा मुलगा ,त्याची बग्गी, डीजे , वेगवेगळी संगीत 
वाद्दे आणि पुढे नाचणारी व-हाड मंडळी,आणि या मुळे  रस्त्याच्या दोन्ही  बाजूला  गाड्यांची लांबलचक रांग लागली होती . सर्व  वहातुक  ठप्प झाली होती. रस्त्यावरचे लोक ताटकळत होते. उशीर होत असल्याने मनात अस्वस्थ होत होते. व उगाचच मनात चीड चीड करत होते.  त्याच वहातुकीत थांबलेली एक गाडी होती. गाडी चालक कुटुंबा बरोबर होता. तो पण ताटकळत गाडीत बसून मिरवणूक  पहात होता. थोड्याच  वेळात तो  गाडीतून उतरला,व त्या व-हाडी मंडळी त जाऊन  नाचू लागला. व-हाडी मंडळी हा कोण अगांतुक पाहुणा म्हणून पाहू लागले पण , तो मात्र मनसोक्त नाचला. शेवटी मिरवणूक जवळचअसलेल्या लग्न स्थळी पोहचताच, गाडी चालक गाडीत येऊन बसला. त्याच्या या कृतीवरुन साधारण मत दिले जाते. की या माणसास मानसोपचाराची गरज असावी ,पण  मी म्हणेल, माणसाच्या या कृतीत  जीवनाचे एक तत्त्वज्ञान  सामावले आहे. इतर व्यक्ती प्रमाणे सद्य परिस्थितीला दोष न देता त्यातून   त्या माणसाने  आनंद शोधला. आपण आपल्या आयुष्यातील मौलिक क्षण निराशेत घालवित असतो. पण जो क्षण समोर आला आहे ,त्यात आनंद  शोधून तो क्षण उपभोगण्यात खरा आनंद आहे. व तो क्षण  त्या  व्यक्ती  ने मिळविला. व आगंतूक पाहुणा जरी असला ,तरी सर्व  उपस्थित व-हाडी मंडळींना त्याने आनंद  दिला.आणि  स्वतःच्या मनास आनंदाने प्रसन्न केले. 
               "मन चंगा तो कठोतीमें गंगा " अशी हिंदी त म्हण आहे आणि अगदी ती खरी आहे. मनाने जर आपण सुदृढ  म्हणजे आनंदी असलो तर  संकटावर ,दुःखावर वा सर्व कठीण परिस्थितीवर मात करु शकतो. जो मनास ताब्यात ठेवू शकतो    म्हणजे , ज्यास राग, द्वेष  आपपर भाव वा कोणाशी हेवा देवा नाही.व  समाधानी असतो. तो खरा मनाने  श्रीमंत म्हणायचा.या जगात सर्वोतोपरी कोणीच सुखी नसतो,.रामदासांनी पण त्यांच्या मनाच्या श्लोकातून  सांगितले च आहे.   मनुष्य जर मनाने आनंदी असेल तर संकटाला  मनातून दूर करुन , प्रसन्न राहू शकतो. मनावर ताबा काबू असल्याने,  जसे निशे नंतर उषःकाल अथवा, सागरास   ओहोटी नंतर भरती हे जसे नैसर्गिक  चक्र चालू असते ना , तसे दुःखा नंतर सुख येणारच हे मनास, आहे त्या परिस्थितीत  समाधान , आनंद मानून ,मनास  प्रसन्नता  दिली की मन आनंदी रहाते . व तसे मनास  प्रसन्न  रहावयास शिकविले पाहिजे .
        माणसाचे मन हे माणसास अनेक   विचाराने  उद्दपित करतअसते. ते आपल्या कडून खूप काही सतत अपेक्षा करत असते. जीवनात यश , किर्ती , सुख , वैभव,आनंद, प्रेम सर्व  काही मिळविण्यासाठी माणसास सतत प्रयत्न करावे लागतात.आणि हे सारे मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास माणसाचे मनच त्यास उद्दुक्त करत असते. आणि, यशस्वी होण्यासाठी यश प्राप्तीसाठी धैर्य लागते ,आत्मविश्वास लागतो .आणि हे सारे आपल्या मनातच  असते.आपणास  जे जे हवे, ते मनच आपणास देवू शकते. आणि हे मन 
समाधानी असेल  संतृप्त असेल तरच ते प्रसन्नता मिळवू शकते.म्हणूनच  "मन करा रे प्रसन्न सर्व  सिध्दीचे साधक " म्हणतात.
       मन प्रसन्न ठेवणे म्हणजे? जीवनात लहान लहान गोष्टी अगदी सकाळ पासून  ते  संध्याकाळ पर्यंत 
वा दिवासभरात आनंद देणा-या घडतच असतात .त्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळविता आला  पाहिजे .
अगदी साधी गोष्ट, आपण लावलेल्या रोपाची होणारी वाढ .त्यास येणारी कोवळी  तांबूस पाने ,मग हळूच उगवणारी फूले  यातून पण आनंद मिळवता येतो. एखादा दिवशी मनासारखे योजलेले काम झाले तरी 
देखिल मानसिक सुख लाभते. सहज बागेत बसले असता अथवा अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला.
 हो! कारण आजकाल चिमण्या पण  फारशा दिसत नाहीत. तर त्या  दिसल्या तरी आनंद मिळतो .तसेच
संध्याकाळी पक्षी एकत्र होऊन थव्याने झाडाकडे येतात बसतात.  पुन्हा  थव्याने उडतात. हा त्यांचा  खेळ
पहाण्यात पण मजा येते, आनंद मिळतो.
      तसेच  सकाळी सकाळी आवडीचे गीत ऐकण्यात आले तर मन  प्रसन्न होऊन," वा ! आजची सकाळ मस्त  झाली.हं. " असे शब्द अपसुक तोंडातून  बाहेर पडतात .अशा रीतीने   आनंद  टीपून घेऊन उपभोगला पाहिजे .  ही मनाची  प्रसन्नता  हेच तर आनंदाने जीवन जगण्याचे गमक आहे. 
      आणि ही  मनाची  प्रसन्नता  अनेक रीतीने मिळविता   येते . कोणी संगीतातून, कलेतून , व्यायामातून
वा लिखाणातून , तर वाचनातून , चित्रकलेतून. एवढेच काय खळखळ वहाणा-या पाण्यातून , वा-याच्या
झुळकीवर डोलणा-या   हिरव्यागार शेतातून तर कधी  मनसोक्त  गप्पातून , हो गप्पा करणे , चार लोकांत
मिसळून ज्ञान मनोरंजन देणे तसेच  मिळविणे  .या सर्व  लहान वाटणा-या गोष्टीतून माणूस निर्भेळ आनंद 
मिळवित  असतो. व आपल्या  मनास प्रसन्न   करण्याचा प्रयत्न करीतच असतो..
             तेव्हा प्रत्येकाने येणारा प्रत्येक क्षण आनंदी मनाने जगला पाहिजे .जगायला शिकले पाहिजे."व्यथा
असो आनंद  असू दे,प्रकाश किंव्हा तिमीर असू दे". सतत आनंदी जगावे. असे कवी पण त्यांच्या   लेखणीतून सांगतात. तसा संदेश देतात. 
              नुसते आयुष्य ढकलत जगण्यात काय अर्थ  ?.आपण जगतांना उगाचच  वय ,   आपला परिवार , कुटुंबातील आपले स्थान , त्यात जर , जास्त शिकलेलो असेल तर, मी माझ्या शिक्षणाच्या , नौकरीच्या स्टेटसला  धरून , घाबरुन , मी असे कसे वागु?असे  म्हणत घाबरत जगत असतो.व स्वतःवर अनेक बंधने घालतो. व छोट्या गोष्टीतील  आनंदापासून  वंचित राहातो. तेव्हा वर्तमानातील  प्रत्येक क्षणात संपूर्ण पणे जगणे हे नेहमी मनास ऊर्जा देत असते.जी   ऊर्जा मनास आनंदी प्रसन्न ठेवते. कारण आनंदाला नेहमी ,सहल  स्थित्यांतर हवे  असते. .तर दुःखाला मात्र  घर हवे असते. जीवन जगण इतकही अवघड नाही.जीवनास 
आपल्याला संगीतमय करता येत.एखाद्या सुरेख मैफलीप्रमाणे सजवाताही येते. आपण असल्याने व नअसल्याने जग चालणारच आहे. जग आपल्या अगोदर पण  चालत होते . त्यामुळे जगाच्या  विचारात  
 आपला क्षण वाया घालवू नये. प्रत्येक  क्षणाला संपूर्ण  आनंद दिला तर जीवनाचा आनंदाचा सूर नक्कीच 
सांपडेल जो मनास सतत प्रसन्न करेल.
        तर सुख  व  दुःख मानण्यात असते .जितके आपण सुख  मिळविण्यासाठी प्रयत्न करतो , तितके ते दूर पळत असते .सुख मृगजळा सारखे असते.म्हणून  मनावर ताबा ठेवून सर्वत्र सुख मानले तर आपण सुखी आहोत असे वाटते .व हे ठरविण्याचे काम फक्त मनच करते. मनासच समजवावे लागते .जे आपल्यास मिळाले आहे  त्यात आपोआपच संतुष्ट पणा येतो.व मन प्रसन्न होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...